'पराभवानंतर जडेजा रडत रडत एकच वाक्य बोलत होता'

Ravindra Jadeja
Ravindra Jadeja

अहमदाबाद : जिगरबाज खेळी करूनही भारताला विजय मिळवून देण्यात अपयशी ठरलेला अष्टपैलू क्रिकेटपटू रवींद्र जडेजा हा पराभवानंतर मी बाद झालो नसतो तर आम्ही जिंकलो असतो’ हे एकच वाक्य सतत रडत बोलत होता, असे त्याची पत्नी रिवाबा हिने सांगितले.

विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेच्या उपांत्य फेरीमध्ये न्यूझीलंडविरुद्ध भारताला 18 धावांनी पराभव झाल्याने भारताचे आव्हान संपुष्टात आले होते. या सामन्यामध्ये जाडेजाने 77 धावांची खेळी करूनही भारताला पराभव टाळता आला नव्हता. धोनी आणि जाडेजाची जोडी मैदानात असेपर्यंत भारतीय चाहत्यांच्या विजयाच्या आशा कायम होत्या. मात्र जडेजा 77 धावांवर झेलबाद झाला आणि त्यानंतर धोनी 50 धावांवर धावबाद झाला आणि भारताचे आव्हान संपुष्टात आले.

भारताला विजय मिळून देण्यात अपयशी ठरलेला जडेजा पूर्णपणे खचू गेला होता. सामन्यात पराभव झाल्यानंतर तो बराच काळ रडत होता अशी माहिती त्याची पत्नी रिवाबा सोलंकी हिने दिली आहे. पराभवानंतर त्याचं रडणं थांबतच नव्हतं. तो रडता रडताच सतत ‘मी बाद झालो नसतो तर आम्ही जिंकलो असतो’ हे एकच वाक्य बडबडत होता,’ असे तिने सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com