Loksabha 2019: मुख्यमंत्र्यांना दाखविल्या काळ्या फिती

Loksabha 2019: मुख्यमंत्र्यांना दाखविल्या काळ्या फिती

अमळनेर - आज अमळनेरमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती. मुख्यमंत्र्यांचे वाहन सभास्थळावर जात असताना पाडळसे धरण कृती समितीने काळ्या फीती दाखविल्या असून वाहन अडविण्याचादेखील प्रयत्न केला.

गेल्या अनेक दिवसांपासून पाडळसे धरणाच्या अपूर्ण  प्रकल्पाकरिता कृती समिती निधीची मागणी करत आहे. पाडळसे धरण आंदोलकांनी मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्याची मागणी आंदोलकांनी केली होती मात्र ती प्रशासनाने फेटाळून लावली होती. एकूण आठ ते दहा आंदोलकांना पोलिसांनी अटक केली आहे. 

दरम्यान, कृती समितीने पाडळसरे धरण जनआंदोलन संघर्ष समितीच्या कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री यांना पाडळसरे धरण संघर्ष समितीच्या कार्यकर्त्यानी पाडळसरे धरण झालेच पाहिजे अशी मागणी या मागण्याचे फलक घेत घोषणा देत अचानक मुख्यमंत्र्यांच्या ताफा थांबविण्याचा प्रयत्न केला आहे. पाडळसरे धरणाचे काम मागील 20 वर्षांपासून रखडलेले आहे. सत्तेत येण्यापूर्वी धरणपूर्तीचे आश्वासन देणाऱ्या सरकारने साडेचार वर्षात धरणास निधी उपलब्ध करून दिला नाही. जलसंपदा मंत्री जिल्ह्यातील असूनही त्यांनी धरणाकडे आणि प्रदीर्घ काळ चाललेल्या आंदोलनाकडे दुर्लक्ष केल्याने जनतेच्या भावना संतप्त आहे.

मुख्यमंत्री यांना भेटून अमळनेरसह 06 तालुक्यातील जनतेच्या धरणाचे निवेदन जनआंदोलन समिती देणार होती. मात्र पोलिस प्रशासनाने एक दिवस आधीच समितीला कोणतेही आंदोलन, निवेदन देण्याचे प्रयत्न करू नये, आंदोलन टोपी घालू नये! असे सांगितले होते. त्यामुळे मुख्यमंत्री यांच्यापर्यत धरणाचे प्रश्नाचे गांभीर्य लक्षात आणून देणेसाठी जनआंदोलन समितीचे कार्यकर्ते प्रा. शिवाजीराव पाटील, रणजित शिंदे, महेश पाटील, देविदास देसले, नामदेव पाटिल, सतिष काटे यांच्यासह अनेक कार्यकर्ते प्रताप मीलमधील रस्त्यावर एक एक करून रस्त्याच्या बाजूला आले. मुख्यमंत्र्यांना धरणाचे फलक व काळे झेंडे दाखवत अचानकपणे मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यासमोर  आले. 'पाडळसरे धरण झालेच पाहिजे!", "धरण आमच्या हक्काचं" अशा घोषणा देण्यात आल्या. यावेळी पोलिसांनीं आंदोलकांना रस्त्याच्या बाजूला रेटण्याचा जोरदार प्रयत्न केला. तर आंदोलकानी धरणाची मागणी यावेळी जोरदारपणे लावून धरली. पाडळसरे धरण तातडीने पूर्ण आमच्या परिसरासाठी अत्यावश्यक आहे या प्रश्नाकडे मुख्यमंत्री यांनी लक्ष द्यावे या उद्देशानेच आम्ही आंदोलन केले असे यावेळी संघर्ष समितीचे प्रा. शिवाजीराव पाटील यांनी सांगितले. 

ही निवडणूक धरणाची व रस्त्यांची नाही असे महायुतीच्या मागील मेळाव्यात जलसंपदा मंत्री यांनी सांगितल्याने समितीचा भ्रमनिरास झाला! असे समितीचे रणजित शिंदे यांनी सांगितले. आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी कडे करून रोखून धरले व अंदोलनकर्त्यांना अटक केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com