पर्यावरणवाद्यांच्या विरोधामुळे कृत्रिम पावसाचा प्रयोग रद्द 

पर्यावरणवाद्यांच्या विरोधामुळे कृत्रिम पावसाचा प्रयोग रद्द 

सोलापूर : तीन क्विंटल लाकूड किंवा ट्रकचे तीन मोठे टायर जाळून त्यात मूठ मूठभर पन्नास किलो मीठ टाकल्यास हवेत पांढरा धूर तयार होतो. त्यातून बाष्पीभवनाद्वारे पाऊस पडतो. डॉ. राजा मराठे यांच्या संशोधनानुसार सोलापूर जिल्ह्यातील सर्व गावांमध्ये शनिवारी व रविवारी हे प्रयोग करण्याचे निश्‍चित करण्यात आले होते. या प्रयोगातून प्रदूषण होत असल्याचा मुद्दा पर्यावरणवाद्यांनी मांडला. या प्रयोगाला विरोध झाल्याने हा प्रयोग रद्द करण्याचा निर्णय जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी आज दुपारी घेतला. 

यंदा जिल्ह्यात समाधानकारक पाऊस न झाल्याने दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. रोज ढग येतात आणि निघून जातात. जिल्हा प्रशासन दुष्काळाशी सामना करण्याचे नियोजन आखत आहे. हे नियोजन आखत असतानाच कमी खर्चाचा कृत्रिम पाऊस पाडण्याचा प्रयोगही हाती घेण्यात आला होता. या प्रयोगाची बातमी राज्यभर पसरली. या प्रयोगाला राज्यातील पर्यावरणवाद्यांनी विरोध केल्याने हा प्रयोग रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. हा प्रयोग कोणाच्या भावना दुखावण्यासाठी किंवा पर्यावरणाची हानी होण्यासाठी करण्याचा उद्देश नाही.

केवळ जिल्ह्यात काही करून पाऊस पाडण्याचा एक छोटासा प्रयत्न होता. मात्र, यातून पर्यावरणप्रेमी जर दुखावले जात असतील, तर विनाकारण वाद नको म्हणून हा प्रयोग रद्द करण्यात आला आहे. दुष्काळाबाबत आत्ताच पंचनामे करण्याच्या सूचना तहसील कार्यालय व कृषी विभागाला देण्यात आल्या आहेत, अशी माहिती डॉ. भोसले यांनी दिली.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com