गोपीनाथ मुंडे, प्रमोद महाजन आज हवे होते : मुख्यमंत्री

गोपीनाथ मुंडे, प्रमोद महाजन आज हवे होते : मुख्यमंत्री

मुंबई : निस्वार्थ काम करणाऱ्या कार्यकर्त्यांमुळे मी येथे आहे. 
देशाचे स्वप्न साकार होणार असेल तर माझ्या आयुष्याची मी आहुतीही देईन, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज (रविवार) सांगितले. तसेच गोपीनाथ मुंडे यांची आज आठवण येत आहे. अडचणीच्या काळात ते महत्वाची भूमिका घ्यायचे. गोपीनाथ मुंडे, प्रमोद महाजन आज असायला हवे होते, असे भावनिक उद्गारही त्यांनी काढले.

भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक पार पडत आहे. त्यानिमित्त आयोजित सभेत मुख्यमंत्री फडणवीस बोलत आहेत. ते म्हणाले, होय माझ्याकडे दैवी शक्ती आहे. महाराष्ट्राचे नागरिक हेच माझे दैवी शक्ती आहेत. मला गमावण्यासाठी काही नाही. मला जनतेसाठी कमवायचे आहे. माझ्या आयुष्यात मी संस्था कारखाने स्वतःचे काढले नाही. मागच्या सरकारने जनतेचे काम न करता स्वतःचे कारखाने वाचविण्यात घालवला. संविधान, लोकशाहीच्या जोरावर कोणताही प्रश्न आपण सोडवू शकतो. मागच्या सरकारच्या काळात प्रश्न निर्माण झाले आणि त्याची आंदोलने आमच्या सरकारच्या काळात झाली. 

जनतेला गृहीत धरून नका, कामाला लागा

महाराष्ट्राची संसद येथे आज बसली आहे. आम्ही आंदोलनाला सामोरे जात त्यावर मार्ग काढला. न्याय दिला. जनतेला गृहीत धरू नका, कामाला लागा, असा सल्लाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी कार्यकर्त्यांनाा दिला. 

जनतेच्या दर्शनासाठी यात्रा

नव्या रणनीतीने विधानसभेच्या मैदानात उतरावे लागले. महाराष्ट्रात यंत्रांचा इतिहास आहे. महाराष्ट्रातील जनतेच्या दर्शनासाठी भाजपची यात्रा काढत आहोत. आपली यात्रा रथयात्रा नाही विकास यात्रा आहे. सामान्य नागरिकांपर्यंत पोहचण्यासाठी ही यात्रा आहे. भाजप कार्यकर्त्यांना भेटण्यासाठी ही यात्रा नसेल

अशी असेल 'महाजनादेश यात्रा' 

1 ऑगेस्टपासून मोझरीतून महाजनादेश यात्रेला सुरवात होत आहेत. 

पहिला टप्पा - मोझरी ते नंदुरबार

दुसरा टप्पा - अकोले, अहमदनगर, नाशिक ही यात्रा 25 दिवस चालणार आहे

मुंबई वगळता ग्रामीण भागात ही यात्रा निघणार आहे. 

30 जिल्ह्यातून ही यात्रा जाणार आहे

152 विधानसभा क्षेत्रात ही यात्रा निघणार आहे. 

या यात्रेनंतर महाराष्ट्र काबीज करण्याचा निर्धार. 

साडेचार हजार किलोमीटरहुन अधिक ही यात्रा असणार आहे. 

300 हून अधिक सभा होणार आहेत. 

यामध्ये जाहीर सभा 104,  228 स्वागत सभा (स्वागत सभेत रथावरून 10 मिनिटं मार्गदर्शन सभा होणार) 
विजय संकल्पसभा देखील होणार आहे. ती सभा मोठी असणार आहे. 

मित्र पक्षाच्या नेत्यांचीही सभेची मागणी. 

या यात्रेत एक रथ असणार आहे. या रथातून मुख्यमंत्री 

रथामध्ये व्यासपीठ तयार करण्यात येणार आहे. जेव्हा एखाद्या ठिकाणी सभा घ्यायची असेल तिथे रथात व्यासपीठ तयार होईल. ज्यात माईकची व्यवस्था देखील करण्यात येणार आहे. 

एलइडी रथाची व्यवस्था देखील करण्यात येणार आहे. यामध्ये चित्रफित दाखवली जाईल

प्रत्येक ठिकाणी पत्रकार परिषद होणार आहे. 

नाशिक तीर्थ क्षेत्रावर समारोप होणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com