एसटीला "रिंगण' लाभदायी! 

एसटीला "रिंगण' लाभदायी! 

मुंबई - पंढरपूरच्या आषाढी वारीतील शेवटचा रिंगण सोहळा एसटीला विशेष लाभदायक ठरला आहे. चंद्रभागा बस स्थानक ते बाजीराव विहीरदरम्यान चालवलेल्या 100 बसद्वारे महामंडळाला तब्बल पाच लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. 

21 जुलैला (नवमी) बाजीराव विहीर येथे शेवटचे रिंगण पार पडले. महामंडळाने चंद्रभागा बसस्थानक ते बाजीराव विहीरदरम्यान 100 बसच्या 500 फेऱ्या चालवल्या. स्थानक ते विहीर या अंतरासाठी महामंडळाने एकेरी 20 रुपये तिकीट आकारले. वारीच्या काळात 18 ते 28 जुलैदरम्यान वारी विशेष म्हणून महामंडळाने तीन हजार 781 फेऱ्या चालवल्या. 

आरोग्य सुविधा 
वारी काळात चार बस स्थानकांवर एस.टी. कर्मचाऱ्यांसाठी दोन वेळ जेवण आणि चहाची मोफत व्यवस्था करण्यात आली होती. वैद्यकीय सुविधा केंद्रात तीन हजार 500 वारकऱ्यांनी लाभ घेतला. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com