चार शेतकऱ्यांची आत्महत्या

Farmer-Suicide
Farmer-Suicide

औरंगाबाद - शेतीसमोरील समस्यांशी दोन हात करणाऱ्या मराठवाड्यातील शेतकरी आत्महत्येचा प्रश्न भीषण होत आहे. बुधवारी (ता. १९) पुन्हा बीड, जालना आणि नांदेड जिल्ह्यात चार शेतकऱ्यांच्या आत्महत्या समोर आल्या आहेत. 

हातडी (ता. परतूर) येथील दीपक भगवंतराव बोरकर (वय २५) या शेतकऱ्याने कर्ज आणि नापिकीला कंटाळून बुधवारी सकाळी आठच्या सुमारास शेतात गळफास घेऊन आत्महत्या केली. दीपक घरातील कर्ता मुलगा होता. दुसऱ्या घटनेत जोगलादेवी येथील संतोष जगन खोजे (वय ३४) या शेतमजुराने गळफास घेऊन बुधवारी आत्महत्या केली. संतोष हे सिद्धेश्वर पिंपळगाव (ता. घनसावंगी) येथील शेतकरी राजेंद्र सातपुते यांच्याकडे सहा महिन्यांपासून मजुरीचे काम करीत होते. सातपुते यांच्या शेतात गळफास घेऊन त्यांनी आत्महत्या केली. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे. 

बीडमधील निरगुडी (ता. पाटोदा) येथे वामन पंढरीनाथ शेलार (६१) काल गळफास घेऊन आत्महत्या केली. निमगाव (ता. हदगाव, जि.नांदेड) येथील संजय नंदू राठोड (वय ३९) यांनीही नापिकीला कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com