सिंचनासाठी निधी वाढवा - नितीन गडकरी

सिंचनासाठी निधी वाढवा - नितीन गडकरी

औरंगाबाद- सिंचन क्षेत्रात वाढ होण्याची गरज असून सिंचनाच्या बजेटमध्ये वाढ करा, अशी सुचना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केली. बुधवारी (ता.16) औरंगाबादेत आयोजित नवव्या आंतरराष्ट्रीय सुक्ष्म सिंचन परिषदेत ते बोलत होते. 

राज्यात पाण्याचा प्रश्‍न गंभीर झाला असून मराठवाड्यात जास्तच दाहकता आहे. सुक्ष्म सिंचनाच्या वापराने पाण्याचा तुटवडा जास्त जाणवणार नाही, तसेच कृषी उत्पादकतेतही वाढत होण्यास मदत होईल असेही गडकरी म्हणाले. राज्यातील शेतकऱ्यांच्या वाढत्या आत्महत्या रोखणे हे राज्य सरकारसमोरील आव्हान असल्याचेही श्री. गडकरी यांनी नमूद केले. शेतकऱ्यांना सेंद्रीय खताचा वापर वाढविण्याचे आवाहन त्यांनी उपस्थितांना शेतकऱ्यांना केले. जायकवाडीत प्रथमच अटलबिहारी वाजपेयी ग्रीडचा फायदा होणार आहे. यामध्ये दोन नद्या एकत्र येणार असून जायकवाडीचा पाणीसाठा 80 टक्के होईल याचा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला. यावेळी विविध विभागाचे अधिकारी यांच्यासह 74 देशातील निमंत्रितांनी हजेरी लावली होती. 

पाण्याचा अतिवापरही घातक - मुख्यमंत्री 
एकीकडे राज्यात सर्वात जास्त दुष्काळ असलेला मराठवाडा भाग आहे, तर सांगलीसारख्या भागात पाण्याच्या अतिवापरामुळे जमिनी खराब झाल्याचा स्पष्टोक्ती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. नानासाहेब देशमुख कृषी संजीवनी योजनेमुळे माती आणि पाणी संवर्धनामुळे मराठवाड्यातील चार हजार गावांना फायदा होणार असल्याचेही फडणवीस म्हणाले. 

जलयुक्तचा ईथेही मिरविला डंका 
दुष्काळाचे संकट ओढवले असताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी आंतरराष्ट्रीय परिषदेतही जलयुक्त शिवार योजनेचा डंका मिरविला. पाणी, चारा टंचाईचा प्रश्‍न गंभीर असताना मुख्यमंत्र्यांनी जलयुक्तचा डंका मिरवू नये अशी अपेक्षा उपस्थित मराठवाड्यातील शेतकऱ्यांनी व्यक्त केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com