साखर 36 रुपये किलो 

Sugar
Sugar

औरंगाबाद - देशात साखरेच्या विक्रमी उत्पन्नामुळे अडचणीत सापडलेल्या साखर कारखान्यांना तारण्यासाठी केंद्र सरकारने शुक्रवारी साखरेच्या किमान विक्री दरात प्रतिक्विंटल दोनशे रुपयांनी वाढ केल्याने साखर कारखान्यांना काहीसा दिलासा मिळाला. यामुळे शहरात सोमवारी (ता.18) किरकोळ बाजारात साखर 35 ते 36 रुपये किलोने विकली गेली. 

साखर कारखान्यांसाठी किमान विक्री मूल्य निश्‍चित केल्यानंतर साखरेच्या दरात वाढ झाली. गेल्या काही वर्षांपासून देशात सारखेचे विक्रमी उत्पादन होत असल्याने लाखो टन साखर शिल्लक राहत आहे. त्यातच निर्यात धोरणाबाबत व्यापारी व सरकारमध्ये असलेल्या संभ्रमामुळे विक्रीवर परिणाम होत असल्याने साखर कारखान्यांच्या अडचणी दूर करण्यासाठी केंद्र सरकारने मागील वर्षी जूनमध्ये साखरेला दो हजार 900 रुपये प्रतिक्विंटल किमान भाव दिला होता. आता तीन हजार 100 रुपयांपर्यंत वाढ झाली.

शहरात सद्यःस्थितीत साखर तीन हजार 250 ते तीन हजार 350 रुपये घाऊक बाजारात विक्री होत असून, किरकोळ बाजारात 35 हजार 50 ते तीन हजार 650 रुपयांनी विकली जात आहे. शहरात रोज 70 टन साखरेची आवक होते. ही आवक जिल्ह्यातील साखर कारखान्यासह नगर जिल्ह्यातून होते. साखरेचे दर वाढल्याने सर्वसामान्य, गोरगरिबांसाठी साखर कडू झाली. साखरेच्या किमान विक्रीदरात वाढ होणार असल्याने काही साखर कारखान्यांनी साखरेचा पुरवठा कमी केला होता. त्यामुळे मागील चार ते पाच दिवसांत कारखान्यांनी साखरेचा पुरवठा 40 टक्‍क्‍यांनी कमी केला होता. काही दिवसांनी किरकोळ बाजारात साखर 37 रुपये किलोपर्यंत विक्री होईल, अशी माहिती साखरेचे होलसेल व्यापारी हरिशंकर दायमा यांनी दिली. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com