मुंबईत 10 वर्षात आगीच्या 53 हजार घटना

fire
fire

मुंबई  : मुंबईत आग लागण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली असून मुंबईत गेल्या 10 वर्षात 53,333 आगीच्या घटना घडल्या असून त्यात 666 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. मुंबईतील गेल्या 10 वर्षात आग लागण्याच्या घटनांची माहिती आरटीआय कार्यकर्ते शकील अहमद यांनी मुंबई अग्निशमन दलाकडे मागितली असता त्यांना वरील माहिती प्राप्त झाली आहे.

मुंबईत गगनचुंबी इमारती असून या इमारती,कार्यालये, वेगवेगळ्या कंपन्या यांना आग लागण्याच्या घटना घडल्या आहेत. यातील अनेक घटनांमध्ये लोकांना आपला जीव ही गमवावा लागला आहे. गेल्या 10 वर्षात मुंबईत 53,333 आगीच्या घटना घडल्या असून त्यात 666 लोकांचा बळी गेला आहे. यात 404 पुरुष, 223 महिला, 34 मुलं आणि 5 अधिकाऱ्यांचा समावेश आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com