फडणवीस सरकार काही महिन्यांपुरतेच : अशोक चव्हाण

फडणवीस सरकार काही महिन्यांपुरतेच : अशोक चव्हाण

मुंबई : पाच राज्यांत झालेल्या विधानसभा निवडणुकांचे निकाल समोर येत आहेत. यामध्ये काँग्रेसची होणारी आगेकूच चांगली आहे. हा एक लोकशक्तीचा विजय आहे. नोटाबंदीसारख्या निर्णयाविरोधातील कौल जनतेने दिला आहे. सध्या या राज्यांत जे काही सुरु आहे, अशीच परिस्थिती महाराष्ट्रातही पाहिला मिळणार आहे. त्यामुळे फडणवीस सरकार काही महिन्यापुरतेच राहील, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी आज (मंगळवार) सांगितले.

छत्तीसगड, मध्यप्रदेश, राजस्थान, तेलंगणा आणि मिझोराम राज्यात झालेल्या विधानसभा निवडणुकांचे निकाल समोर येत आहे. या निकालावर आज महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या वतीने पत्रकार परिषद घेण्यात आली. या पत्रकार परिषदेत अशोक चव्हाण म्हणाले, पाच राज्यांत झालेल्या विधानसभा निवडणुकांचे निकाल समोर येत आहेत. यामध्ये काँग्रेसची आगेकूच होत आहे. हा एक लोकशक्तीचा विजय आहे. नोटाबंदीसारख्या निर्णयाविरोधातील कौल जनतेने दिला आहे. सध्या या राज्यांत जे काही सुरु आहे, अशीच परिस्थिती महाराष्ट्रातही पाहिला मिळणार आहे. त्यामुळे फडणवीस सरकार काही महिन्यापुरतेच राहिल, महाराष्ट्रातसह असेच चित्र पाहिला मिळेल. 

हेच जनतेचे 'सच्चे दिन' : राधाकृष्ण विखे-पाटील

या निवडणुकांच्या निकालानंतर हे समोर येत आहे, की आता पंतप्रधान नरेंद्र मोदींचा प्रभाव संपल्याचे दिसून येत आहे. मागील निवडणुकीत काँग्रेसच्या विरोधात मतदान केल्याने आम्ही विश्वासघात केल्याची भावना जनतेमधून व्यक्त होत आहे, असे विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com