पावसाने दडी मारल्याने भातशेती संकटात ; शेतकरी चिंताग्रस्त 

Farmers is in Tension Paddy
Farmers is in Tension Paddy

वाडा : पालघर जिल्ह्यात पावसाने गेल्या पंधरा दिवसांपासून दडी मारल्याने व कडक उन्हामुळे भातशेती संकटांत आली आहे. भात तयार होण्याच्या ऐन मोसमात पावसाने दडी मारल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. 

वाडा तालुक्यात 14 हजार हेक्टर क्षेत्रामध्ये भाताचे उत्पन्न घेतले जाते. विविध भाताच्या वाणाची लागवड येथे केली जाते. यावर्षी सुरवातीपासूनच भात पिकाला आवश्यक असणारा असा समाधानकारक पाऊस पडत होता. त्यामुळे भातशेती बहरली होती. मात्र गेल्या पंधरा दिवसांपासून पावसाने अचानक दडी मारल्याने व कडक उन्हामुळे शेतातील साचलेले पाणी ही सुकून गेले आहे. त्यामुळे शेताला तडे जाऊ लागले आहेत. भातपिक तयार होण्याच्या ऐन मोसमात पावसाने दडी मारल्याने भात पिके कोमेजून जाऊ लागली आहेत.

सध्याच्या परिस्थितीत शेतीला पावसाची गरज असून भाताच्या लोंबीमध्ये दाणा होत असताना आता पाण्याची नितांत आवश्यकता आहे. मात्र ऐन मोसमात पावसाने दडी मारल्याने भाताचा दाणा कितपत भरेल अशी शंका शेतकरी उपस्थित करू लागले असून शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. शेतकऱ्यांनी सहकारी सेवा सोसायटी व इतर ठिकाणांहून कर्ज काढून भातशेती लावली आहे. मात्र, पावसामुळे भातशेती धोक्यात आल्याने शेतकरी चिंतातुर झाला आहे. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com