गणेशोत्सवासाठी एसटीच्या २,२०० जादा बसगाड्या

ST
ST

मुंबई  - गणेशोत्सवादरम्यान २ हजार २०० जादा बसगाड्या सोडण्याचा निर्णय एसटी महामंडळाने घेतला आहे. या बसगाड्यांचे आरक्षण २७ जुलैपासून सुरू होईल. 

मुंबईत राहणाऱ्या चाकरमान्यांची गणेशोत्सवात कोकणात जाण्यासाठी गर्दी उसळते. यामुळे गणेशोत्सवाच्या काळात कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी एसटी महामंडळ कोकणात २ हजार २०० जादा बसगाड्या सोडणार आहे, अशी घोषणा परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी केली. गणेशोत्सवासाठी पहिल्या टप्प्यात २८ ऑगस्ट ते २ सप्टेंबर या काळात जादा बसगाड्या सोडल्या जातील. या बसगाड्यांची आगाऊ तिकीटविक्री २७ जुलैपासून सुरू होणार आहे. चाकरमान्यांना परतीच्या प्रवासाचे संगणकीय आरक्षणही २७ जुलैपासूनच करता येईल. 

गणेशोत्सवाच्या काळात कोकणात जाण्यासाठी मुंबईतील चाकरमानी गटागटाने बसगाड्या आरक्षित करतात. उपनगरांतील रहिवाशांना एकत्र येऊन एकाच गावाकडे अथवा पंचक्रोशीतील गावांकडे जाण्यासाठी एसटी बस आरक्षित करणे सोईचे ठरते. या ग्रुप बुकिंगला (गट आरक्षण) शनिवारपासून (ता. २०) सुरवात होत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com