पूर्ण मोबदला मिळेपर्यंत जमिनी सोडू नका - पाटकर

Medha-Patkar
Medha-Patkar
नवी मुंबई - नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पात विस्थापित झालेल्या ग्रामस्थांनी पूर्ण मोबदला मिळेपर्यंत आपल्या जमिनी न सोडण्याचे आवाहन आज सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर आणि उल्का महाजन यांनी केले. येथील प्रकल्पबाधितांच्या पुनर्वसनाची जबाबदारी पूर्णपणे सरकारची असून, ती त्यांना नाकारता येणार नसल्याचेही या वेळी त्यांनी सांगितले. नवी मुंबईत बांधण्यात येणाऱ्या आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पासाठी 10 गावे विस्थापित होत आहेत. या वेळी मेधा पाटकर यांनी सांगितले, की प्रकल्पग्रस्तांना देण्यात येणारी नुकसानभरपाई ही मूळ बाजारभावाच्या चारपटीने अधिक असायला हवी. हा बाजारभाव सरकारने ठरवलेला नसावा. सरकार जर 2030 साली वाढणाऱ्या ट्रॅफिकच्या काळजीतून विमानतळ उभारत असेल, तर 11 वर्षांत तिथल्या भूमिपुत्रांचे कुटुंबही वाढलेले असेल, याची योग्य ती दखल घेत त्यांच्या रोजगाराचा प्रश्नही सरकारने प्राधान्याने सोडवणे आवश्‍यक आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com