राज्यातील शहीद जवानांच्या कुटुंबाना प्रत्येकी 50 लाख रुपये देणार

राज्यातील शहीद जवानांच्या कुटुंबाना प्रत्येकी 50 लाख रुपये देणार

तासगाव - आम्ही पेटलेले आहोत.. सर्वांच्या मनात राग आहे.. जवानांच्या गाडीवर भ्याड हल्ला केला आहे. त्याचा निषेध व्यक्त करतो. जवानांच्या कुटुंबानो काळजी करू नका. आम्ही सर्व जण तुमच्या पाठीशी आहोत. आम्ही जवानांच्या बलिदानाचा बदला घेणार आहे,अशा शब्दात पुलवामा येथे जैशे महंमद या दहशतवादी संघटनेने जवानांवर केलेल्या हल्ल्याचा निषेध मुख्यमंत्री देवेंद फडणवीस यांनी केला. व  राज्यातील शहीद जवानांच्या कुटुंबाना प्रत्येकी 50 लाख रुपये देणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री फडणवीस यांनी येथे केली. 

तासगाव येथे छत्रपती शिवाजी महाराज आणि डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे अनावरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. केंद्रीय मंत्री रामदास आठवले अध्यक्षस्थानी होते. महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, पालकमंत्री सुभाष देशमुख, खासदार संजयकाका पाटील उपस्थित होते.

पाकिस्तान हा देश भिकारी झाला आहे. त्यांना त्यांची जागा दाखवून देणार आहे. हा जुना भारत नाही. हा नवीन भारत आहे. आम्ही जवाब देणार आहे, असेही मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. 

पुतळा अनावरणाचा हा ऐतिहासिक सोहळा असल्याचे गौरवोद्गार महसूलमंत्री पाटील यांनी काढले. शिवाजी महाराजांच्या बरोबरीने घरात बाबासाहेबांचा फोटो लावा, हा सामाजिक सलोखा दाखवा, असे आवाहनही त्यांनी केले.

भारत टायगर, पाकिस्तान उंदीर 

भारत टायगर आहे, पाकिस्तान उंदीर आहे. आपली ताकद दाखवू, अशा शब्दात केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी जवानांवर झालेल्या हल्ल्याचा निषेध केला.

आठवले म्हणाले, पाकचा माज उतरवला पाहिजे. मोदी लवकरच इम्रान खानचा ताज तोडून टाकतील. पाकिस्तानवर पेटता बोळा फिरवण्याची वेळ आली आहे. त्यांची आमने सामने लढाईची औकात नाही. आम्ही शिवरायांचे वंशज आहोत. पाकिस्तानला धडा शिकवला जाईल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com