वॉटर कप स्पर्धेत चुंब गाव प्रथम, दहा लाखांचे मानकरी

chumb village got first price in water cup competition
chumb village got first price in water cup competition

वैराग : बार्शी तालुक्यात 'सत्यमेव जयते' 'पाणी फाऊंडेशन वॉटर कप स्पर्धे'त चुंब गावाने प्रथम क्रमांक मिळविला असून तालुक्यासाठी असलेले दहा लाख रुपयांचे बक्षीस पटकावले आहे. तर उत्कृष्ट काम केल्या बद्दल शासनाकडून पाच लाख रुपयांचे असे एकुण पंधरा लाख रुपयांचे बक्षीस पटकावले.

खडकोणी गावाने दुसरे तर राळेरास गावाने तिसरा क्रमांक मिळविला आहे. मात्र रातंजन हे गाव या स्पर्धेतून बाद ठरले आहे. या स्पर्धतील निकालाकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष्य लागून राहीले होते. या वॉटर कप स्पर्धेचा निकाल रविवारी 12 ऑगस्ट पुणे येथील बालेवाडी क्रिडा संकुलात पार पडला. यावेळी बक्षीस वितरणही करण्यात आले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्या हस्ते तर वॉटर कप स्पर्धेचे प्रणेते अभिनेता अमिर खान, अभिनेत्री किरण राव यांच्या उपस्थितीत अशोक जाधवर, किशोर जाधवर व मैना जाधवर यांनी प्रथम क्रमांकाचे बक्षीस स्विकारले. सन्मानपत्र व दहा लाख रूपयांचा धनादेश असे बक्षीसाचे स्वरूप आहे. वॉटर कप स्पर्धा 2018 मध्ये बार्शी तालुक्यात 8 एप्रिल ते 22 मे अशा 45 दिवसाच्या कालावधीत ही स्पर्धा राबविण्यात आली. यामध्ये 49 गावांनी सहभाग घेतला होता. त्यापैकी 34 गावांनी प्रशिक्षन घेतले होते. तालुक्यात या स्पर्धेत सहभाग घेतलेल्या गावांनी केलेला लोकसहभाग, श्रमदानातून यांत्रीक पद्धतीने सुमारे 25 लाख घनमीटरचे काम झाले. या कामामुळे बार्शी तालुक्यात वार्षीक 250 कोटी लिटर पाणीसाठा निर्माण करण्याची क्षमता झाली. शासकिय मुल्यांकनाने या कामांची किंमत 50 कोटी रूपये इतकी होते. मात्र हे काम केवळ 45 दिवसांत पूर्ण झाले. 

यासाठी लाभलेला लोकसहभाग, प्रशासकिय अधिकारी, कर्मचाऱ्यांचा सहभाग बार्शीचे तहसिलदार ऋषीकेत शेळके यांचे प्रोत्साहन व थेट सहभाग, भारतीय जैन संघटनेच्या आर्थीक पाठबळामुळे तालुक्यात एवढया मोठ्या प्रमाणात जलसंधारणाची कामे उभी राहीली. या कामांत झालेल्या विविध समितीच्या भेट व मुल्यांकनात चुंब, खडकोणी, राळेरास व रातंजन या चार गावांची  निवड झाली. त्यात चुंब या गावाने जलयुक्त शिवारात राबविलेले सलग समतल चर, कंट्रोल बल्डींग, शेततळे, शेती-बांद, नाला बंदीस्त, पाणलोट साठवण तलाव, ओढा खोलीकरण, रुंदीकरण, रोपवाटीका, शिव व शिवारात पावसाने वाहून पाणी अडवण्यासाठी दगडांची बंधारे, मुरूम-माती बंधारे आदी कामे चुंब ग्रामस्थांनी श्रमदान, लोकसभागाने ऐक्य जपत कायम पाण्यासाठी केलेला निर्धार सार्थ ठरला. बक्षीस स्विकारल्यानंतर ग्रामस्थांनी आनंदोत्सव साजरा केला. या स्पर्धेसाठी पाणी फाऊंडेशन तालुका समन्वयक नितीन आतकरे, अब्दुल शेख यांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com