पाण्यापासून वंचित गावे कर्नाटकाला जोडण्याची सहमती द्यावी : येताळा भगत

mangalwedha
mangalwedha

मंगळवेढा : बहुचर्चित मंगळवेढा तालुक्याचा पाणीप्रश्न सोडवणार नसाल तर तालुक्यातील वंचीत गावे कर्नाटकाशी जोडण्यची सहमती द्यावी असा इशारा शिवसेना तालुकाध्यक्ष येताळा भगत यांनी दिला. 

राज्यातील सत्तेत सहभागी असलेल्या शिवसेनेच्या वतीने मंगळवेढा तालुक्यातील पाणीप्रश्न व अन्य प्रश्नांच्या सोडवणुकीबाबत प्रांत कार्यालयावर मोर्चा काढून याबाबतचे निवेदन दिले. यावेळी जि.प.सदस्या शैला गोडसे, तालुकाध्यक्ष येताळा भगत, कृषी उत्पन्न बाजार समितीचे अध्यक्ष 
सोमनाथ आवताडे, तुकाराम  कुदळे, चंद्रकांत पडवळे, गणेश गावकरे, राजू बाबर, महादेव साखरे, सुनिल दत्तु, विनोद कदम आदी उपस्थित होते.

या मागण्यामध्ये तालुका दुष्काळ जाहीर करण्यात यावा. शेतीपंपाचे लाईटबिल 100% माफ करावे, म्हैसाळ उपसा सिंचन योजनेचे पाणी सोडून शिरनांदगी तलाव भरून द्यावा. उजनी कॅनॉलची अपूरी कामे त्वरीत पूर्ण करून तालुक्यातील संपूर्ण लाभक्षेत्र सिंचनाखाली आणावे. पौट मध्यम प्रकल्पाचे काम त्वरीत चालू करावे. नीरा उजव्या कालव्याचे 100% अस्तरीकरण करून बचत पाण्यातून तालुक्यातील 24 गावांना पाणी उपलब्ध करावे.

उजनी व म्हैसाळ कॅनॉलखाली संपादित जमिनीचा मोबदला बाजारभावाच्या पाचपट मिळावा. या मागण्याचा यामध्ये समावेश होता .यावेळी बोलताना जिल्हा परिषद सदस्या शैला गोडसे म्हणाल्या की, पावसाने ओढ दिल्यामुळे तालुक्यातील शेतकरी आर्थिक अडचणीत आला असून प्रशासनाने याबाबतच्या उपाययोजना तातडीने कराव्यात.वरिष्ठ स्तरावर पाठपुरावा करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहे. यावेळी गणेश गावकरे यांचेही भाषण झाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com