कारखांदारांनी साखर उत्पादनावरच भर न देता इथेनोल निर्मितीसाठीही प्रयत्नशील राहावे

कारखांदारांनी साखर उत्पादनावरच भर न देता इथेनोल निर्मितीसाठीही प्रयत्नशील राहावे

मंगळवेढा - कारखांदारांनी केवळ साखर उत्पादनावरच भर न देता इथेनोल निर्मितीसाठीही प्रयत्नशील राहावे असे प्रतिपादन आ.प्रशांत परिचारक यांनी व्यक्त केले. 

कचरेवाडीतील युटोपियन शुगर्सच्या ५ व्या बॉयलर अग्निप्रदीपन व गळीत हंगामाच्या शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते. व्यासपीठावर राकेश टोळ्ये, पांडुरंग परिवाराचे कुटुंबप्रमुख सुधाकरपंत परिचारक, आ. प्रशांतराव परिचारक, पांडुरंग कारखान्याचे उपाध्यक्ष वसंतनाना देशमुख, दिनकरभाऊ मोरे, दाजी पाटील, दिलीप अप्पा घाडगे, योगिनीताई पोपळे, बाबासाहेब क्षीरसागर, चरणूकाका पाटील, शिवाजी काळुंगे, शिवाजी नागणे, चंद्रशेखर कोंडूभैरी, औदुंबर वाडदेकर, शिवानंद पाटील, यांच्या समवेत विविध संस्थांचे पदाधिकारी, ऊस उत्पादक मोठ्या प्रमाणात यावेळी उपस्थित होते. 

प्रारंभी युटोपियन शुगर्सचे इंजिनीअर कमलाकर सूर्यवंशी व त्यांच्या सौभाग्यवती सौ.कविता सूर्यवंशी यांच्या शुभहस्ते सत्यनारायन महापूजा करण्यात आली. यावेळी बोलताना आ. परिचारक म्हणाले की, भविष्यामध्ये साखर कारखानदारी चांगल्या पद्धतीने चालावी या करिता विद्यमान सरकार हे महत्वपूर्ण योजना आखत असून, त्याचाच एक भाग म्हणून साखरेला हमी भाव देण्याचा निर्णय घेतला आहे. आवश्यक असणार्‍या साखरेपेक्षा जवळपास ५० लाख मे.टन अधिकचे उत्पादन होत असल्याने कारखानदारी अडचणीत आली. त्या करिता शासनाने २९०० रुपये किमान दर जाहीर केला. साखर कारखान्यांना अधिकचे उत्पादन किमत मिळाल्यास सदरची रक्कम ही आपल्या ऊस उत्पादकांना देऊन त्यांचा आर्थिकस्तऱ उंचावणे शक्य होईल. अतिरिक्त उत्पादनाने मोठ्या प्रमाणावर साखरसाठा शिल्लक आहे. शासनाने या करीता इथेनोलनिर्मितीस भर देण्याचा प्रयत्न केला असून, त्या करिता विविध सवलतीही जाहीर केल्या आहेत.

प्रास्ताविकात अध्यक्ष उमेश परिचारक म्हणाले की, ऊस उत्पादकाला केंद्रबिंदू मानून अधिकाधिक दर देण्यासाठी प्रयत्नशील असून, कारखान्याकडे आम्ही उद्योग पाहत असून भविष्यात आमची स्पर्धा पांडुरंग कारखान्याशी राहणार आहे. कारखान्याकडे सध्या ८९७५ हेक्टर इतक्या ऊसाची नोंद असल्याने गळीत हंगाम १८-१९ मध्ये कारखाना ७ लाख २० हजार मे. टन गाळपाचे उद्दीष्ट पूर्ण करेल असा आशावाद व्यक्त केला.

सदर प्रसंगी पांडुरंग परिवाराचे कुटुंबप्रमुख सुधाकरपंत परिचारक, कार्यकारी संचालक उत्तमराव पाटील, चरणूकाका पाटील, शिवाजीराव काळुंगे, बाबासो क्षीरसागर, योगिनीताई पोपळे यांची भाषणे झाली. 
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लक्ष्मण पांढरे यांनी तर आभार मुख्य शेती अधिकारी धनंजय व्यवहारे यांनी मानले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com