मन, बुद्धीच्या शुद्धीकरणासाठी हरिपाठ

गणेश कला क्रीडा रंगमंच - प्रवचन करताना बाबा महाराज सातारकर.
गणेश कला क्रीडा रंगमंच - प्रवचन करताना बाबा महाराज सातारकर.

पुणे - ‘एकाग्रचित्ताने आपल्या मनामध्ये विठ्ठल असणे, ही धारणा आहे. त्याचे चिंतन करणे, त्यावर लक्ष केंद्रित करणे म्हणजे ध्यान आहे. जी धारणा आपल्या मनामध्ये असते, तेच ध्यान आपल्यामध्ये कायम राहते. मन आणि बुद्धीमधील घाण मानवी शरीरातून बाहेर काढण्यासाठी हरिपाठ आहे,’’ असे प्रतिपादन प्रवचनकार बाबा महाराज सातारकर यांनी केले.

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट आणि सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे चातुर्मास सोहळ्यानिमित्त सातारकर यांच्या प्रवचनाचे आयोजन केले होते. संतश्रेष्ठ ज्ञानेश्‍वर महाराजांच्या हरिपाठावर ते निरूपण करीत आहेत.
 सातारकर म्हणाले, ‘‘कोणतीही गोष्ट अवघड असेल, तर माणूस त्याकडे प्रवृत्त होत नाही; त्यापासून दूर जातो. त्यामुळे संतांनी फार मोठा विचार केला आहे.

संत ज्ञानेश्‍वरांनी सोप्या भाषेत हरिपाठ लिहिला. ईश्‍वरी सत्तेला शेवटचा शब्द ‘आत्मा’ आहे. आपण संतांना आत्मा म्हणत नाहीत, तर महात्मा म्हणतो. यातच संतांची महती समजते.’’ प्रवचनाचा कार्यक्रम १९ ऑगस्टपर्यंत दररोज सायंकाळी सात ते आठ या वेळेत होणार आहे. महिनाभर सुरू राहणाऱ्या या प्रवचनाला विनामूल्य प्रवेश असून, पुणेकरांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन ट्रस्टतर्फे करण्यात आले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com