डाळींमधील तेजी भावाची हमी देणार?

Dal
Dal

पुणे - डाळींच्या भावात निर्माण झालेली तेजी ही शेतकऱ्यांना हमीभाव मिळण्याच्या दृष्टीने महत्त्वाची असून, ग्राहकांनाही रास्त भावात डाळी उपलब्ध करून देण्याकरिता सरकारने आपल्याकडील साठा विक्रीसाठी खुला करणे आवश्‍यक आहे. या वर्षी पाऊस कमी झाल्याने कडधान्यांचे उत्पादन घटू शकते. त्यादृष्टीनेही सरकारकडून उपाययोजनांची तयारी केली गेली पाहिजे, असे मत व्यापारी व्यक्त करीत आहेत.

कमी पाऊस झाल्याचा परिणाम कडधान्यांच्या उत्पादनावर होणार असल्यानेच डाळींच्या भावात तेजी निर्माण झाली आहे. गेल्या दोन वर्षांत देशातील कडधान्यांचे उत्पादन चांगले होते. यामुळे कडधान्य आणि डाळींचे भाव तुलनेत कमी होते. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा नोव्हेंबर महिन्यातील पुण्यातील घाऊक बाजारातील भाव हे अधिक आहेत. खरीप हंगामातील पेरणी कमी झाली आहे, रब्बी हंगामातील चित्र अद्याप स्पष्ट झाले नाही. यामुळे सरकारने भाव नियंत्रणात ठेवण्यासाठी आत्ताच उपाय योजना करण्याची आवश्‍यकता आहे, असे मत व्यापारी विजय राठोड यांनी व्यक्त केले आहे. देशातील उत्पन्न, शिल्लक साठा आणि गरज लक्षात घेऊन कडधान्य आयात करण्याचे धोरण स्वीकारावे लागेल, असेही त्यांनी नमूद केले.

दोनवर्षांपूर्वी डाळींच्या भावात मोठी तेजी निर्माण झाली होती. उत्पादन घटल्याने ती तेजी निर्माण झाली होती. सलग दोन वर्षे हवामानाने साथ दिल्याने उत्पादन वाढले आणि डाळींचे भाव नियंत्रणात आले होते. या वर्षी पेरणी कमी झाली आहे. यामुळे उत्पादन घटू शकते. सरकारने जाहीर केलेला हमीभाव मिळू शकतो. ग्राहकांचा विचार करता सरकारने त्यांच्याकडील साठाही विक्रीला काढून समतोल साधला पाहिजे.
- नितीन नहार, व्यापारी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com