... म्हणून जिल्ह्यातील शेतकरी चिंतेत

ONIAN 1.jpg
ONIAN 1.jpg

मंचर :  कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात गुरुवारी (ता. 18) आठ हजार कांदा पिशव्यांची आवक झाली. प्रति दहा किलोला 120 ते 135 रुपये बाजारभाव मिळाला. गेल्या महिन्यात प्रति दहा किलोला 170 रुपयांपर्यंत बाजारभाव मिळाला होता. कांद्याच्या बाजारभावात सुधारणा होत नसल्याने शेतकरी वर्ग चिंतेत आहे. 

केंद्र सरकारने निर्यातीवरील कांदा अनुदान बंद केले आहे. त्याचा फटका कांदा उत्पादकांना बसला आहे. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने चाळीमध्ये कांदे खराब होण्याचा धोका असतो. तसेच उच्च शिक्षणासाठी विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रियेसाठी शेतकऱ्यांना पैशांची नितांत गरज आहे. त्यामुळे लाखणगाव, देवगाव, काठापूर, रांजणी, चास, महाळुंगे पडवळ, गावडेवाडी, घोडेगाव, नारोडी, पारगाव आदी भागांतील शेतकऱ्यांनी मंचर बाजार समितीत कांदा विक्रीसाठी आणला होता. येथे लिलाव पद्धतीने शेतकऱ्यांच्या समक्ष कांदा खरेदी विक्रीचे व्यवहार होतात. कांदा खरेदीसाठी पुणे, मुंबईचे व्यापारी आले होते. पण बाजारभाव पुरेशा प्रमाणात न मिळाल्याने कांदा उत्पादकांची निराशा झाली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com