आगीच्या घटनांकडे पीएमपीचे दुर्लक्ष !

आगीच्या घटनांकडे पीएमपीचे दुर्लक्ष !

पुणे : पीएमपीची सेवा विस्तारण्यासोबत ती सुधारण्यावर व्यवस्थापनाने भर दिला असला, तरी बस गाड्यांना आग लागणार नाही, यासाठी उपाययोजना होत नसल्याचे दिसून येते. गेल्या वर्षभरात आठ बस गाड्याना आग लागण्याच्या घटना घडल्या आहेत. 

सतत मार्गांवर धावणाऱ्या बसमधील ओव्हर हीट, जुनाट वायरिंग आणि कुलिंग यंत्रणा हे बस गाड्यांना आग लागण्याची प्रमुख कारणे आहेत. वर्षभरामध्ये शहरातील हडपसर, विमाननगर, संचेती, रामटेकडी व पिंपरी यासह वेगवेगळ्या भागांमध्ये बसला आग लागण्याच्या घटना घडल्या आहेत. यातील बहुतांश बस पूर्णपणे जळून खाक झाल्या. यामुळे पीएमपी प्रशासनाचे लाखो रुपयांचे नुकसान होत असून, त्या बसच्या दुरुस्तीसाठी मोठा खर्च करावा लागतो आहे.

बसला लागलेली आग आटोक्‍यात आणण्यासाठीची यंत्रणाही बसमध्ये उपलब्ध नसल्याने त्यासाठी अग्निशामक दलाची वाट पाहावी लागते. यादरम्यान बस जळून जाते. ही यंत्रणा बसमध्ये बसविण्याची मागणी प्रवाशांकडून वारंवार होत असताना पीएमपी प्रशासनाकडून त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com