‘जलशक्ती’मध्ये व्यापक सहभाग हवा

Naval-Kishor-Ram
Naval-Kishor-Ram

पुणे - जलशक्ती अभियानाच्या सक्षम अंमलबजावणीसाठी सर्व घटकांचा सहभाग आवश्‍यक आहे. सहभाग वाढविण्यासाठी संबंधित सरकारी विभागांकडून नियोजन करण्यात यावे, अशा सूचना जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिल्या.

केंद्रीय जलशक्ती मंत्रालयातर्फे दुष्काळी जिल्ह्यांत जलशक्ती अभियान राबविण्यात येत आहे. यात जलसंधारण, पावसाच्या पाण्याचे संकलन आणि पाणलोट क्षेत्र विकासावर भर देण्यात येणार आहे. जिल्ह्यातील शिरूर, पुरंदर तालुक्‍यांचा समावेश आहे. अभियानातील सद्यस्थितीचा आढावा जिल्हाधिकारी राम यांनी घेतला. या बैठकीस विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.जलसंधारण कामांची सद्यःस्थिती, छतावरील पाण्याचे संकलन, पारंपरिक पाणी योजनांचे नूतनीकरण तसेच विहिरी आणि विंधनविहिरी पुनर्जीवित करण्यासाठी आवश्‍यक उपाययोजना करण्याबाबत त्यांनी आढावा घेतला.

पीकपद्धती, ठिबक सिंचनाचा वापर आणि सहभाग वाढविण्याबाबत चर्चा झाली. संबंधित अधिकाऱ्यांनी नियोजन करून कामे पूर्ण करावीत. ग्रामसेवक, तलाठी, कृषी सहायक, भूजल यंत्रणेसह गावातील सरपंच यांची तालुकास्तरीय कार्यशाळा आयोजित करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com