शरद पवारांची माघार कॉंग्रेस आघाडीला मारक ः ऍड. प्रकाश आंबेडकर 

शरद पवारांची माघार कॉंग्रेस आघाडीला मारक ः ऍड. प्रकाश आंबेडकर 

जळगाव ः भारिप बजुजन महासंघ संलग्नित वंचित बहुजन आघाडीने चार मतदारसंघ वगळता सर्व ठिकाणी उमेदवार दिले आहेत. आमच्या आघाडीकडे होणारी गर्दी निश्‍चितच मतदानात परिवर्तित होईल. लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेस आघाडी स्पर्धेत नसून भाजप आणि वंचित बहुजन आघाडी अशीच लढाई असेल. शिवाय शरद पवार यांनी माघार घेतल्याने राष्ट्रवादी- कॉंग्रेस आघाडीला मारक ठरणार असल्याचे मत खासदार ऍड. प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकार परिषदेत बोलताना मांडले. 
वंचित बहुजन आघाडीची जाहीर सभा शहरात होत आहे. त्यासाठी जळगावी आले असता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ऍड. आंबेडकर म्हणाले, की लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी- कॉंग्रेस आघाडी ही स्पर्धेतच उरलेली नाही. कारण त्यांच्या अध्यक्षांचे उभे राहण्याचे निश्‍चित होत नाही. आता खुद्द शरद पवारांनी निवडणुकीतून माघार घेतल्याने त्यांचा निर्णय कॉंग्रेस आघाडीला मारक ठरणार आहे. तसेच या निवडणुकीत मोदी लाट राहिलेली नाही. व्यापारी वर्ग मोदी सरकारविरोधी गेल्याचे चित्र आहे. यामुळे वंचित बहुजन आघाडीच्या पन्नास टक्‍के जागा निवडून येतील, असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला. 
नागपूर, अकोला, सोलापूर आणि उत्तर पश्‍चिम मुंबई हे मतदार संघ सोडून सर्व ठिकाणी वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार दिले आहेत. शिवाय औरंगाबाद आणि उत्तर- मध्य मुंबई येथे एमआयएम उमेदवारांसाठी जागा सोडण्यात आली आहे. वंचित बहुजन आघाडीच्या जाहिरनाम्यात "केजी टू पीजी' ही शिक्षणाची जबाबदारी सरकारची असावी म्हणून यंग जनरेशनला स्पर्धेमागे न धावता पॉझिटीव्ह विचार करण्याचा प्रयत्न राहणार नाही. म्हणजेच मानवतावाद टिकवायचा असेल, तर स्पर्धा फ्री करायचे आहे. तसेच पॅरलल बॅंकिंग सिस्टीम विना तारण कर्ज देणारी हशी; अशी सिस्टीम तयार करणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com