रेल्वेतर्फे 'कोच मित्र' ही नवीन सेवा आता उपलब्ध

manmad
manmad

मनमाड - रेल्वेने प्रवास करतांना प्रवाशांना एसीच्या आरक्षित डब्यात उदभवणाऱ्या समस्येचं निराकरण करण्यासाठी रेल्वेतर्फे 'कोच मित्र' ही नवीन सेवा आता उपलब्ध होणार आहे. प्रवासादरम्यान कोचमध्ये साफसफाई, लाईट, पाणी, शौचालय आदी तक्रारींचं निवारण हे कोच मित्र करणार आहे. त्यामुळे अधिक सुखकर प्रवासाचा आंनद प्रवाशांना लुटता येणार आहे. दिलेल्या लिंकवर क्लिक करून प्रवाशांना त्यांच्या समस्या नोंदविता येणार आहे.

सुखकर आणि निर्विघ्न प्रवास म्हटलं की रेल्वेचा पर्याय पुढे येतो. सध्या भारतात लाखो प्रवासी रेल्वेने प्रवास करत असतात दिवसेंदिवस प्रवाशांची संख्या वाढत असून गाड्यांचीही संख्या वाढत आहे. रेल्वेने प्रवास करतांना विशेषतः आरक्षित एसी डब्याने प्रवास करतांना आरामदायी वाटत असले तरी अनेक समस्याना प्रवाशांना तोंड द्यावे लागते. कधी डब्यात उंदरांचा सुळसुळाट असतो. तर कधी साफसफाई, इलेक्ट्रिकल, शीट, अंथरून, शौचालय स्वच्छता, पाणी, एसी आणि कोच संबधी छोटी मोठी समस्या असते. मात्र धावत्या गाडीत हे सांगायचे कोणाला असा प्रश्न पडतो. टीसी तिकीट तपासण्याचे काम करतात. त्यामुळे प्रवाशांना मोठी अडचण निर्माण होते. याबाबत प्रवाशांच्या अनेकदा तक्रारी असतात त्यामुळे रेल्वेने प्रवाशांना अडचण निर्माण होऊ नये त्यांचा प्रवास अधिक सुखकर व्हावा यासाठी कोच मित्र ही सुविधा सुरू केली आहे. 

विविध समस्या सोडविण्यास कोड प्रकाशीत केले आहे. सी - साफसफाई, ई - इलेक्ट्रिकल, एल - शीट चादर आणि लिनेन, पी - पेस्ट कंट्रोल, आर - किरकोळ दुरुस्ती, टी - शौचालय स्वच्छता, डब्ल्यू - पाणी. गाडीने प्रवास करत असतांना अचानक कोचमधील या समस्या निर्माण झाल्या तर प्रवाशाने पीएनआर आणि उदभवलेली समस्येचा मॅसेज रेल्वेने दिलेल्या नंबरवर पाठवावे लागणार आहे. त्यानंतर हा मेसेज कंट्रोल रुमला जाईल. तेथून संबंधित गाडीत असलेल्या कोच मित्रापर्यंत पाठविले जाईल. कोच मित्र येऊन समस्येचं निराकरण करेल.

समस्या सुटल्यावर प्रवाशाला मॅसेजद्वारे कळविले जाईल. सध्या रेल्वे तर्फे ही सुविधा उत्तर - पश्चिम रेल्वेमध्ये सुरू करण्यात आली आहे. मध्य रेल्वेमध्ये ही सुविधा लवकरच सुरू करण्यात येणार आहे रेल्वेचे म्हणणे आहे. की ही सेवा सुरू करण्याचा मुख्य उद्देश असा की प्रवाशांना प्रवास सुखकर होवो हाच मुख्य उद्देश आहे. 

भारतीय रेल्वे प्रशासन द्वारे प्रवासी सुविधेसाठी योग्य निर्णय आहे रेल्वे 'कोच मित्र' संकल्पने मुळे रेल्वे प्रवाशांना जागे वरच सर्व सेवा सुविधा उपलब्ध होणार आहे. यामुळे जेष्ठ नागरिक, वयोवृद्ध प्रवासी, महिला प्रवासी, आजारी प्रवासी, दिव्याग (अपंग) प्रवासी यांना याचा प्रत्यक्ष लाभ होईल. 
- नितिन पांडे, मध्य रेल्वे क्षेत्रीय समिती सदस्य ,मुंबई झोन

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com