इथेनॉल निर्मितीला प्रोत्साहन देणे मूर्खपणा

देसरडा
देसरडा

इथेनॉल निर्मितीला प्रोत्साहन देणे मूर्खपणा
नागपूर : उसाला सर्वाधिक पाणी लागते. त्याच्यापासून इथेनॉलची निर्मिती मूर्खपणा असल्याची टीका अर्थतज्ज्ञ व महाराष्ट्र राज्य नियोजन मंडळाचे माजी सदस्य एम. देसरडा यांनी केली.
रविभवन येथे पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, एक हजार व्यक्‍तींना वर्षभर पाणी मिळेल इतके पाणी एक हेक्‍टर उसाला लागते. उसाच्या लागवडीवर निर्बंध घालण्याची गरज आहे. उसापासून इथेनॉल तयार करण्यात येते. हे इथेनॉल आर्थिकदृष्ट्या परवडण्यायोग्य नाही. शिवाय सामाजिक दृष्टिकोनातूनही चांगले नाही. त्याची निर्मिती ही मूर्खपणा आहे. पाणीसाठा कमी आहे. त्यामुळे संपूर्ण पाणी पिण्यासाठी आरक्षित ठेवणे आवश्‍यक आहे. राज्यात भीषण दुष्काळजन्य परिस्थिती आहे. 1972 च्या दुष्काळापेक्षाही जास्त भीषण दुष्काळीस्थिती आहे. शेतकऱ्यांची आर्थिकस्थिती बिकट आहे. शासनाने दुष्काळ जाहीर केला असून मदतीचा प्रस्ताव केंद्र शासनाकडे पाठविला आहे. केंद्राकडून मदत मिळण्यास विलंब लागणार आहे. केंद्राची वाट न पाहता राज्य शासनाने शेतकऱ्यांना तत्काळ मदत करणे आवश्‍यक आहे. शेतकऱ्यांना हेक्‍टरी 20 हजार रुपयांप्रमाणे 1 लाखापर्यंतची मदत दिली पाहिजे, अशी मागणीही त्यांनी केली. दुष्काळी परिस्थिती हाताळण्यासाठी धोरण तयार करणे आवश्‍यक असल्याचेही ते म्हणाले.
पुण्यात 23 नोव्हेंबरला बैठक
महाराष्ट्र राज्य दुष्काळ निवारण व निर्मूलन मंडळ व सर्व्हंट्‌स ऑफ इंडिया सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने "दुष्काळ, पाणीटंचाई, शेतीअरिष्ट' समस्येवर 23 नोव्हेंबरला पुण्यातील गोखले अर्थशास्त्र संस्था येथे दुपारी एकला बैठकीचे आयोजन करण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com