संत्रा पिकाचे  ४० टक्‍के नुकसान 

संत्रा पिकाचे  ४० टक्‍के नुकसान 

जलालखेडा  - जगप्रसिद्ध असलेल्या विदर्भातील संत्रा पीक व उत्पादक मागील काही वर्षांपासून अवकाळी पाऊस व बदलत्या वातावरणामुळे जेरीस आले आहेत. जानेवारी महिन्यात झालेली गारपीट व एप्रिल महिन्यात सातत्याने होत असलेला तापमान बदल यामुळे संत्रा पिकाचे ४० टक्‍क्‍यांपर्यंत नुकसान झाले आहे. 

नागपूर जिल्ह्यातील काटोल, नरखेड, कळमेश्‍वर, सावनेर व हिंगणा तालुक्‍यात सुमारे ४५ हजार हेक्‍टर क्षेत्रात संत्रा पीक घेण्यात येते. मागील काही वर्षांत संत्रा पिकाला निसर्गाची व वातावरण बदलाची नजर लागल्याचे चित्र आहे. मागील वर्षी २०१७ साली मे महिन्यात झालेल्या पावसामुळे ताणाचे गणित बिघडले. ८० टक्‍क्‍यांपर्यंत मृग बहर गळाला. 

सप्टेंबर व ऑक्‍टोबर यंदा जानेवारी महिन्यात गारपीटीमुळे संत्रा बागायतदारांचे नुकसान झाले. आता एप्रिल महिन्यात सातत्याने होत असलेल्या तापमान बदलाचा फटका संत्रा उत्पादकांना सहन करावा लागत आहे. तापमान ४४ डिग्रीपर्यंत पोहचल्याने फळगळ होण्याचे प्रमाण वाढले आहे. अशातच भूजल पातळीत होणारी घट यामुळे सिंचनास अडथळा निर्माण होणार असल्याने संत्रा गळती वाढेल असे जार शेतकऱ्यांनी सांगितले. 

मृग बहराची फुट निसर्गाच्या अनियमितेमुळे कमी झाली. काही भागात गारपीट झाल्याने त्याचे नुकसान झाले. तसेच गारपीटीच्या वेळी यावर आंबिया बहार देखील होता याचे नुकसान झाले. पण आता गारपिटीचा प्रभाव राहिला नाही. आता फक्त वाढत्या तापमानामुळे काही प्रमाणत फळांची गळ होईल. शेतकऱ्यांनी नियोजन करून सिंचन केल्यास फळगळ कमी होईल. 
- अजय आटे, तालुका कृषी अधिकारी, नरखेड 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com