अहमदनगर : शून्य टक्के व्याजाचे कर्ज १९५१ कोटी

चालू वर्षी खरीप व रब्बी हंगामासाठी अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेमार्फत तब्बल १९५१ कोटी १७ लाख ८२ हजार रुपयांचे पीककर्ज शून्य टक्के व्याजदराने वाटप करण्यात आले आहे.
Crop Loan
Crop LoanSakal
Summary

चालू वर्षी खरीप व रब्बी हंगामासाठी अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेमार्फत तब्बल १९५१ कोटी १७ लाख ८२ हजार रुपयांचे पीककर्ज शून्य टक्के व्याजदराने वाटप करण्यात आले आहे.

अहमदनगर - चालू वर्षी खरीप व रब्बी हंगामासाठी अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेमार्फत (ahmednagar district central bank) तब्बल १९५१ कोटी १७ लाख ८२ हजार रुपयांचे पीककर्ज (Crop Loan) शून्य टक्के व्याजदराने (Interest Rate) वाटप करण्यात आले आहे. सेवा संस्थांच्या माध्यमातून जिल्ह्यातील तीन लाख ३२ हजार शेतकरी (Farmer) सभासदांना या योजनेचा लाभ झाला, अशी माहिती बॅंकेचे अध्यक्ष ॲड. उदय शेळके यांनी दिली.

शेतकऱ्यांना पीककर्ज वेळेत मिळावे, यासाठी बॅंकेच्या माध्यमातून कायम प्रयत्न होत आहेत. शेतकऱ्यांनी या कर्जाची फेड विहित मुदतीत केल्यास संबंधित शेतकऱ्यांना शून्य टक्के व्याजदराचा लाभ मिळणार आहे. यामध्ये तीन लाखांपर्यंतची कर्ज रक्कम शेतकऱ्यांनी मुदतीत (३१ मार्च २०२२ व ता. ३० जून २०२२) परतफेड केल्यास केंद्र सरकार व राज्य सरकारची प्रत्येकी तीन टक्केप्रमाणे सवलतीची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर डीबीटीमार्फत जमा होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना शून्य टक्के व्याजदराचा लाभ होणार आहे. त्यासाठी शेतकऱ्यांनी प्रथम संपूर्ण पीककर्ज व्याजासह विहित मुदतीत भरणे आवश्यक आहे.

पाच लाखांच्या कर्जावरही लाभ

जिल्हा बॅंक तीन लाख ते पाच लाख रुपयांपर्यंतच पीककर्ज रकमेवरील व्याज स्वनिधीतून भरणा करणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकरी सभासदांना २०२१-२२ पासून पाच लाख रुपयांपर्यंतचे अल्पमुदतीचे कर्ज शून्य टक्के व्याजदराने उपलब्ध होणार आहे. यासाठी शेतकरी सभासदांनी त्यांच्याकडील अल्पमुदत पीककर्जाची विहित मुदतीत व्याजासह परतफेड करावी, असे आवाहन अध्यक्ष ॲड. शेळके, उपाध्यक्ष माधवराव कानवडे व संचालक मंडळाने केले आहे.

Crop Loan
त्यांनाही माणसासारखं जगू द्या!

कर्जवाटप...

  • खरीप पीककर्ज वाटप (रुपये) - १७०३ कोटी

  • रब्बी पिककर्ज वितरण - २४८ कोटी

  • एकूण कर्जवाटप - १९५१ कोटी

राज्यात अहमदनगर जिल्हा बॅंकेचा लौकिक आहे. कायम शेतकरी हिताचे निर्णय घेतले जात आहेत. शेतकऱ्यांनी वेळेत कर्जफेड करून शून्य टक्के व्याजाच्या योजनेला लाभ घ्यावा. पाच लाखांचे कर्ज असलेल्यांनाही ही सुविधा असल्याने शेतकऱ्यांना चांगला आर्थिक हातभार लागणार आहे.

- ॲड. उदय शेळके, अध्यक्ष, अहमदनगर जिल्हा सहकारी बॅंक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com