तर 12,000 कर्मचाऱ्यांना नोकरी गमवावी लागेल... 

तर 12,000 कर्मचाऱ्यांना नोकरी गमवावी लागेल... 

नवी दिल्ली: कर्जाच्या बोझ्याखाली असलेली 'आलोक इंडस्ट्रीज'ची लवकरच विक्री होण्याची शक्यता आहे. परिणामी कंपनीच्या सुमारे 12,000 कायमस्वरूपी कर्मचा-यांना नोकरी गमवावी लागण्याची शक्यता आहे. बॅंकरप्सी अर्थात दिवाळखोरीचा कायद्याची अंमलबजावणी झाल्यानंतर 12 हजार लोकांना नोकरी गमवावी लागण्याची ही पहिलीच घटना असेल. सरासरी 1.45 लाख रुपये वार्षिक वेतन घेत असलेल्या लोकांना नोकरी गमवावी लागण्याची अधिक शक्यता आहे. 

एका इंग्रजी वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार, गेल्या वर्षीपर्यंत आलोक इंडस्ट्रीजकडे  11,759  पूर्ण वेळ काम करणारे कर्मचारी होते. कंपनीत एकूण कर्मचारी संख्या सुमारे 18,000 होती. शिवाय 2016-17 च्या आर्थिक वर्षात कंपनीने कर्मचाऱ्यांच्या  पगारावर 283.31 कोटी रूपये खर्च केले होते. 

सध्या कंपनी कर्जाच्या परिस्थितून मार्ग काढण्यासाठी प्रयत्न करीत आहे. मात्र त्याला यश न आल्यास 12 हजार कमर्चाऱ्यांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळण्याची शक्यता आहे. कंपनीच्या शेअरधारकांना देखील कंपनी बंद पडल्यास मोठ्या प्रमाणावर नुकसान होणार आहे. कंपनीचे सुमारे  2.05 लाख गुंतवणूकदार आहेत. 

सध्या मुंबई शेअर बाजारात आलोक इंडस्ट्रीजचा शेअर 4.85 टक्क्यांच्या घसरणीसह 3.14 रुपयांवर व्यवहार करतो आहे. सध्याच्या शेअरच्या बाजारभावानुसार कंपनीचे 432.48 कोटी रुपयांचे बाजारभांडवल आहे. 


 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com