सरकारमुळे 'किंगफिशर' बंद - मल्ल्या

Vijay Mallya
Vijay Mallya

नवी दिल्ली - किंगफिशर एअरलाईन्स रसातळाला जाण्याचे खापर उद्योगपती विजय मल्ल्यांनी सरकारवर फोडत, सरकारची चुकीची विमान वाहतूक धोरणे किंगफिशर एअरलाइन्स बंद होण्यास जबाबदार असल्याचे म्हटले आहे.

देशातून फरार घोषित करण्यात आलेले उद्योगपती मल्ल्यांनी केंद्र सरकारवर हल्ला चढवला आहे. बँकांचे नऊ हजार कोटींचे कर्ज बुडविल्याचा मल्ल्या यांच्यावर आरोप आहे. मल्ल्या हे सध्या लंडनमध्ये वास्तव्यास असून, त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून सरकारवर टीका केली आहे.

केंद्राने सरकारी विमान वाहतुक कंपनी असणार्‍या 'एअर इंडिया'ला आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी सर्वसामान्य जनतेचा पैसा वापरला. मात्र स्थानिक विमान कंपनी असणार्‍या किंगफिशर एअरलाइन्स बाबत दुजाभाव केला. आम्ही सरकारकडे मदतीची मागणी केली होती. मात्र कोणत्याही कर्जाची मागणी आमच्याकडून करण्यात आली नाही, असे मल्ल्यांनी म्हटले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com