कमी व्याजदरांसाठी महागाईवर नियंत्रण आवश्यक- पटेल

Urjit Patel
Urjit Patel

मुंबई : व्याजदर कमी होण्यासाठी महागाईवर नियंत्रण आवश्यक असून गुंतवणूक वाढीस लागण्यासाठी व्याजदरांची अर्थपूर्ण रचना गरजेची आहे, असे मत रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर ऊर्जित पटेल यांनी व्यक्त केले आहे. तसेच, केंद्र आणि राज्यांची मोठी कर्जे कमी करावीत असेही त्यांनी सूचविले. 

जी-20 देशांमध्ये भारताची वित्तीय तूट सर्वाधिक असून ती कमी करण्याचे मोठे आव्हान देशासमोर सध्या आहे. पतमापन संस्था पतमानांकन निश्चित करताना जीडीपीऐवजी वित्तीय तूट किती आहे यावर अधिक लक्ष देतात. त्यामुळे नियंत्रित करणे अत्यंत गरजेचे आहे, असे प्रतिपादन पटेल यांनी केले. व्हायब्रंट गुजरात परिषदेत ते बोलत होते. 

महागाई स्थिर करण्याच्या दृष्टीने आमचा प्रयत्न असून यासाठी आधीदेखील काम करण्यात आले आहे. व्याजदर कमी करण्यासाठी महागाई दर कमी आणि स्थिर असणे गरजेचे आहे ज्यायोगे मजबूत गुंतवणूकीच्या आधारे आर्थिक विकास साध्य होईल, असेही पटेल म्हणाले. सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या पुनरुज्जीवनासाठी रिझर्व्ह बँकेकडून प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com