आणखी एका सर्जिकल स्ट्राईकची गरज : लष्करप्रमुख रावत

Bipin Rawat
Bipin Rawat

नवी दिल्ली : काश्मीरमधील सध्याची परिस्थिती पाहता दहशतवाद्यांविरोधात आणखी एका सर्जिकल स्ट्राईकची गरज असल्याचे मत लष्करप्रमुख बिपीन रावत यांनी म्हटले आहे.

सोमवारी एका वृत्तवाहिनीशी बोलताना रावत यांनी सध्या आणखी एक सर्जिकल स्ट्राईकची गरज आहे का असे विचारले असता हे उत्तर दिले. काश्मीरमधील उरी येथे लष्कराच्या तळावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय जवानांनी पाकिस्तानच्या हद्दीत घुसून सर्जिकल स्ट्राईक केला होता.

रावत म्हणाले, की पुन्हा एकदा असे पाऊल उचलण्याची गरज निर्माण झाली आहे. पण, आम्ही याची अंमलबजावणी कशी करणार आहोत, हे सार्वजनिक करू शकत नाही. भारत-पाकिस्तान सीमेवर शस्त्रसंधी लागू असताना सीमेपलिकडून दहशतवाद्यांची घुसखोरी सुरुच आहे. काश्मीर खोऱ्यात शांतता निर्माण होण्यासाठी दहशतवाद्यांविरोधात कडक पाऊल उचलावी लागणार आहेत. पाकिस्तानबरोबर रद्द झालेली द्विपक्षीय चर्चा योग्यच होती. चर्चा आणि दहशतवाद हे एकाच वेळी पुढे जाऊ शकत नाही. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com