भाजपच्या चित्रफितीमुळे नवे वळण

हैदराबाद बलात्कार प्रकरण : एमआयएमच्या आमदाराच्या मुलाचा हात?
Raghunandan Rao
Raghunandan RaoSakal

हैदराबाद - हैदराबादमधील अल्पवयीन मुलीवरील बलात्कार प्रकरणाला रविवारी नवे वळण मिळाले. मजलिस-ए-इत्तेहदुल (एमआयएम) पक्षाच्या आमदाराच्या मुलाचा यात हात असल्याचा दावा करणारी चित्रफिती भाजपने जारी केली आहे.

या चित्रफितीमध्ये काही छायाचित्रेही आहेत. त्यात पिडीतेसह आमदाराचा मुलगा दिसून येतो. तो मुलीशी लगट करीत होता आणि त्यावेळी इतर आरोपी हजर होते, असा भाजप आमदार रघुनंदन राव यांचा दावा आहे. पोलिसांनी मात्र तो फेटाळून लावला आहे. गुन्हा घडला त्यावेळी आमदाराचा मुलगा हजर नव्हता असे पोलिसांचे म्हणणे आहे.

पोलिसांना सवाल

राव यांनी पोलिसांना सवाल केले आहेत. आमदाराच्या मुलाचे आरोपी म्हणून नाव का घेतले जात नाही, असा सवाल करून ते म्हणाले की, मुलगी अल्पवयीन होती आणि तिच्यावर लैंगिक अत्याचार झाल्याचे पोलिसांनी मान्य केले आहे. आता हे कुणी केले याचे उत्तर पोलिसांना द्यावेच लागेल. तेव्हा मर्सिडीजमध्ये असलेल्यांविरुद्ध पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल का करण्यात आलेला नाही. आपल्याकडे आणखी पुरावे असल्याचा दावाही राव यांनी केला आहे. एमआयएम आमदाराच्या कुटुंबियाने मात्र आपला मुलगा पेस्ट्री-कॉफी शॉपपाशी मोटारीतून उतरला. गुन्हा घडला तेव्हा तो तेथे बसून होता, असा दावा केला आहे.

दोन मुले ताब्यात

याप्रकरणी पोलिसांनी दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले. अन्य एका संशयिताला सादुद्दीन मलिक याला यापूर्वीच अटक झाली आहे. पाचव्या आरोपीला पकडण्यासाठी शोध सुरु आहे. अल्पवयीन मुलाला ताब्यात घेण्यात आल्याने अटक झालेल्या आरोपींची संख्या चारपर्यंत गेली आहे. एक अल्पवयीन मुलगा सत्ताधारी तेलंगण राष्ट्र समितीच्या स्थानिक नेत्याचा मुलगा आहे.

राज्यपालांनी अहवाल मागविला

तेलंगणच्या राज्यपाल तमिलीसाई सौंदरराजन यांनी मुख्य सचिव तसेच पोलिस महासंचालक यांच्याकडून दोन दिवसांत अहवाल मागविला आहे. या घृणास्पद कृत्याबद्दल तीव्र यातना होत असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

युपीतून बुलडोझर आणून सरळ करू...

भाजपचे प्रदेशाध्यक्ष बंडी संजय कुमार यांनी बलात्कार प्रकरणी आक्रमक भूमिका घेतली, पण त्यांचे वक्तव्य वादग्रस्त ठरले आहे. उत्तर प्रदेशमधून बुलडोझर आणून वठणीवर आणू, असे ते म्हणाले. याप्रकरणी मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणीही त्यांनी केली. संजय यांनी तेलंगण सरकारवर टीका केली. त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, केंद्रातील भाजप सरकारने तेलंगणला २.५२ लाख कोटी रुपये दिल्याचा पुरावा आहे, मात्र श्रीलंकेत जसा देश एका कुटुंबामुळे देश कर्जबाजारी झाला तसेच तेलंगण दिवाळखोरीत गेला आहे. आता नव्या कर्मचाऱ्यांना वेतन किंवा निवृत्तिवेतन देणेही सरकारला शक्य नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com