देशातील मध्यमवर्ग आता जोमाने 'उडणार' 

File photo of Air India
File photo of Air India

नवी दिल्ली : देशांतर्गत विमान वाहतुकीमध्ये गेल्या काही वर्षांमध्ये वेगाने वाढ होत आहे. याची दखल घेत केंद्र सरकारने आता देशांतर्गत विमानतळांच्या सक्षमीकरणावर आणि विमान वाहतुकीवर अधिक भर देण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे मध्यमवर्गाचा विमान प्रवास अधिक सुखद आणि सोपा होण्याची चिन्हे आहेत. केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी आज (गुरुवार) अर्थसंकल्प सादर केला. आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वीचा मोदी सरकारचा हा शेवटचा पूर्ण अर्थसंकल्प आहे. 

काय होणार?

  • विमानतळांची संख्या 5 टक्क्यांनी वाढविण्यात येणार
  • नव्याने 900 पेक्षा जास्त विमानांची खरेदी करणार
  • सध्या 124 विमानतळे सेवेत, कनेक्टिविटी वाढविण्यासाठी उडान योजनेला भर
  • विमानतळांची संख्या वाढली तर सुविधा पुरविण्यावर भर
  • विमानतळांची संख्या वाढली तर 100 कोटी नागरिकांना सुविधा पुरविणे शक्य
  • उडान योजनेंतर्गत 56 नवी विमानतळे जोडण्यात येणार
  • बुलेट ट्रेनसाठी वडोदरा येथे रेल्वे विद्यापाठ सुरु करणार
  • अहमदाबाद-मुंबई बुलेट ट्रेनसाठी वडोदरा येथे प्रशिक्षित कर्मचारी तयार करण्याचे काम सुरू

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com