70 वर्षात काँग्रेसनं फक्त 74 विमानतळं बांधली : ज्योतिरादित्य सिंधिया

Jyotiraditya Scindia
Jyotiraditya Scindiaesakal
Summary

'आता भारतात विमानतळाची क्षमता वाढवण्याची वेळ आलीय.'

नागरी विमान वाहतूक मंत्री (Civil Aviation Minister) ज्योतिरादित्य सिंधिया (Jyotiraditya Scindia) यांनी आज (सोमवार) काँग्रेसवर जोरदार निशाणा साधला. काँग्रेसच्या (Congress) काळात 70 वर्षात भारतात फक्त 74 विमानतळं होती आणि आता गेल्या 8 वर्षात भाजपनं (BJP) 70 अतिरिक्त विमानतळं बांधली आहेत, अशी टीका सिंधिया यांनी काँग्रेसवर केलीय. दिल्लीत ते नागरी विमान वाहतूक व आंतरराष्ट्रीय परिषदेला (International Council) संबोधित करताना बोलत होते. गेल्या 8 वर्षांत या क्षेत्रात प्रचंड वाढ झालीय. आता भारतात विमानतळाची क्षमता वाढवण्याची वेळ आलीय. येत्या 10 ते 15 वर्षांत भारत 720 विमानांच्या ताफ्यातून 1000-2000 विमानांपर्यंत वाढ करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.

गेल्या 5 दिवसांपासून रशिया आणि युक्रेनमध्ये (Russia Ukraine War) संघर्ष सुरूय. अशा स्थितीत भारतानं तिथून आपल्या नागरिकांना परत आणण्यासाठी मोहीम तीव्र केलीय. युक्रेनची राजधानी कीवमधून आतापर्यंत 1100 हून अधिक भारतीय सुखरूप मायदेशी परतले असून अजूनही मोठ्या संख्येनं नागरिक तिथं अडकले आहेत. याच पार्श्वभूमीवर पीएम मोदींनी (PM Narendra Modi) आज उच्चस्तरीय बैठक घेतली. यादरम्यान केंद्रीय मंत्री हरदीप पुरी, ज्योतिरादित्य सिंधिया, किरेन रिजिजू आणि व्हीके सिंह हे विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी युक्रेनच्या शेजारील देशांत जातील, असा निर्णय घेण्यात आलाय. यापूर्वी गुरुवारीही पंतप्रधान मोदींच्या अध्यक्षतेखाली सुरक्षाविषयक मंत्रिमंडळ समितीची बैठक झाली. यामध्ये संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (NSA) अजित डोवाल, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि इतर अनेक मंत्री सहभागी झाले होते.

Jyotiraditya Scindia
Russia-Ukraine War : लग्न होताच दाम्पत्याला हाती घ्यावी लागली बंदूक

यापूर्वी इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर (Indira Gandhi International Airport) युक्रेनमधून सुखरूप परत आलेल्या नागरिक आणि विद्यार्थ्यांचे मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी गुलाबपुष्प देऊन स्वागत केलं होतं. विमानातील प्रवाशांशी संवाद साधताना सिंधिया यांनी सर्व प्रवाशांना प्रोत्साहन दिलंय. युक्रेनमधील प्रत्येक भारतीयाला सुखरूप परत आणलं जाईल, असंही आश्वासन त्यांनी सर्व नागरिकांना दिलंय. पंतप्रधान मोदी सतत युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांच्या संपर्कात असून प्रत्येक भारतीयाला परत येण्यासाठी ते बोलत आहेत, असंही ते म्हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com