मोदी सरकारने 8 नोव्हेंबरच्या रात्री चलनातील पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा रद्द केल्याचे जाहीर केले. सगळीकडे हल्लकल्लोळ माजल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली. पेट्रोल पंप, रुग्णालये, औषध विक्रेते अशा अतिमहत्वाच्या ठिकाणी जुन्या नोटा स्वीकारल्या जातील असेही जाहीर करण्यात आले. मात्र जुन्या नोटा रद्द झाल्याची बातमी झळकल्याने बहुतेक अतिमहत्वाच्या ठिकाणी या नोटा स्वीकारण्यास नकार देण्यात आला. त्यानंतर दुसऱ्या दिवशीपासून बॅंका आणि पोस्ट कार्यालयात नोटा बदलून देण्यास सुरुवात करण्यात आली. शिवाय एटीएम्समधून रोख रक्कम काढण्याची सुविधा सुरूच होती. नोटाबंदीची घोषणा झाल्यानंतर आठ दिवसांनीही गर्दी म्हणावी तेवढी कमी झाल्याचे चित्र दिसत नाही. त्या 'आमचं काय चुकलं?' असा सहज विचार मनात येणं साहजिकच आहे. त्या अनुषंगाने खालील मुद्दे अधोरेखित करावेसे वाटतात.
वरील प्रमुख बाबी सोडल्या तर या 8 नोव्हेंबरपूर्वी देखील आपण काही चुका केल्या आहेत. जरा व्यापक दृष्टिने पाहिले तर त्या ही आजच्या परिस्थितीला कारणीभूत असल्याचे दिसून येईल.
राहिला प्रश्न दोन हजार रुपयांच्या नोटेचा...तर ज्यावेळी एखादा नवा पूलाचे बांधकाम काढले जाते, त्यावेळी त्या पुलाच्या शेजारून पर्यायी रस्ता किंवा पूल उपलब्ध करून देण्यात येतो. पर्यायी रस्ता हाच हमरस्ता नसतो, हे भान आपल्यालाही राहिलेले नाही.
येथे काळा पैसा निर्मिती होण्यामागच्या काही प्रातिनिधीक कारणांचा उल्लेख केला आहे. प्रत्येकच गोष्ट प्रत्येकालाच लागू पडेल असे नाही. मात्र कळत-नकळतपणे आपण या काळा पैसा निर्मितीच्या प्रक्रियेत प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे सहभागी असतोच. खरं तर विद्यमान सरकारऐवजी पूर्वीच्या सरकारनेच नोटा बंद करण्याचा निर्णय घेतला असता तर आज ही वेळ आली नसती. अर्थात गर्दी झालीच असती. पण आतापर्यंत आपण आर्थिक उत्क्रांतीच्या एका वेगळ्या टप्प्यापर्यंत पोचलो असतो. असो. मोदी सरकारने हा धाडसी निर्णय घेतला आहे आणि त्यातून काही प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे लाभ होतील ते येणाऱ्या काळात दिसून येतीलच.
बॅंकेतील गर्दी कमी होत आहे. लोकांना त्रास होत आहे. तरीही लोक आनंदित आहेत. "हे ही दिवस जातील' आणि आनंदाचे, सर्वसामान्यांच्या समृद्धीचे आणि भरभराटीचे दिवस येतील. पर्यायाने आपला भारत देश परमवैभवाकडे भरारी घेऊ शकेल. त्यामुळे या आणि यासारख्या अनेक क्रांतिकारी निर्णयांना आणि त्यामुळे होणाऱ्या त्रासाला सामोरे जाण्यास सज्ज होणे काळाची गरज आहे.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.