‘केंद्राच्या निर्णयाने देशात आर्थिक अराजकता येईल’

sitaram
sitaram

लखनौ - केंद्र सरकारच्या ५०० व एक हजारच्या नोटा रद्द करण्याच्या निर्णयावर मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षाने टीका केली आहे. केंद्राने देशात आर्थिक अराजकता निर्माण केली आहे, अशी टीका माकपचे सरचिटणीस सीताराम येचुरी यांनी केली आहे. 

देशातील मूळ मुद्यांवरून नागरिकांचे लक्ष हटविण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्न करीत असल्याचे ते म्हणाले. केंद्र सरकारने नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण केला आहे. गरीब आपल्या नित्याच्या गरजा भागविण्यासाठी धडपडत असताना त्यांचे जगणेही त्रासदायक केले आहे. आगामी हिवाळी अधिवेशनात याबाबत संसदेत मुद्दा उपस्थित केला जाईल. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर डाव्या पक्षांच्या एकीचे दर्शन घडविण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या रॅलीच्या वेळी येचुरी बोलत होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com