Sushma Swaraj
Sushma Swaraj

149 नवे पासपोर्ट सेवा केंद्र सुरु करणार: स्वराज

नवी दिल्ली - आता कोणत्याच भारतीयाला पासपोर्ट मिळवण्यासाठी 50 किलोमीटरपेक्षा जास्त लांब जावे लागणार नाही. केंद्र सरकार संपूर्ण देशभरात पासपोर्ट सेवा केंद्रे (पीएसके) उभारणार आहे. यासाठी देशातील प्रमुख 650 टपाल कार्यालयांची मदत घेण्यात येणार आहे. त्यामुळे आता देशातील प्रमुख टपाल कार्यालये देखील पासपोर्टची सेवा देऊ शकणार आहेत, अशी माहिती केंद्रीय परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज यांनी शनिवारी दिली.

स्वराज यांनी देशात 149 ठिकाणी पासपोर्ट सेवा केंद्र उघडणार असल्याची यावेळी घोषणा केली. टप्प्या टप्प्यांमध्ये काही केंद्रे सुरू केली जाणार असून पहिल्या टप्प्यात 86 केंद्र सुरू करण्यात येणार आहेत. त्यानंतर दुसर्‍या टप्प्यात 52 कार्यान्वित होणार आहे.

टपाल कार्यालयातील या केंद्रांव्यतिरिक्त सरकारने यापूर्वी 16 पासपोर्ट सेवा केंद्रे उभारली आहेत, असे त्या म्हणाल्या. "जेव्हा मी मंत्रालयाचे कामकाज हाती घेतले, त्यावेळी आमच्याकडे संपूर्ण देशभरातून केवळ 77 पासपोर्ट सेवा केंद्र होते आणि त्यामुळे बर्‍याच लोकांना पासपोर्ट मिळवण्याकरिता तीनशे ते चारशे किलोमीटर लांब जावे लागते. याचा त्रास नागरिकांना सहन करावा लागतो. या पार्श्वभूमीवर पासपोर्ट काढणे सहज शक्य व्हावे, यासाठी प्रत्येक आणखी नवी केंद्रे सुरू करण्याचा निर्णय परराष्ट्र मंत्रालयाने घेतला आहे,'' असेही त्या म्हणाल्या.

आमच्या मंत्रालयाने पासपोर्ट मिळवण्यासाठी कोणत्याही नागरिकला 50 किलोमीटरपेक्षा जास्त लांब जावे लागू नये असे निश्चित केले आहेत. त्याप्रमाणे आम्ही लक्ष्य निर्धारित केले असून त्यानुसार नियोजन देखील केले आहे.

परदेशातील भारतीय युवकांना भारतीय संस्कृतीशी जोडण्यासाठी सुषमा स्वराज यांनी परराष्ट्र मंत्रालयाच्या अंतर्गत एक "नो इंडिया प्रोग्रॅम" नावाने वेब पोर्टल सुरू केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com