नवी दिल्ली - ""मी पूर्णपणे मांसाहारी मनुष्य असून मला कोणी काय खावे वा खाऊ नये, याचा सल्ला कधी दिला नाही. कोणी काय खावे, हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. अशा विषयावर वाद होऊच कसा शकतो?,'' असे मत केंद्रीय मंत्री व्यंकय्या नायडू यांनी आज (सोमवार) व्यक्त केले.
देशात सध्या गोमांसासंदर्भातील बंदीसंदर्भात सुरु असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर नायडू यांनी मांडलेले हे मत अत्यंत महत्त्वपूर्ण मानले जात आहे.
""तुम्हाला गोमांस खावयाचे असेल; तर खा. मात्र त्याचा उत्सव करण्याची काय गरज आहे? त्याचप्रमाणे तुम्हाला जर चुंबन घ्यावयाचे असेल; तर घ्या. त्याचाही उत्सव करण्याची वा त्यासाठी कोणाची परवानगी घ्यावयाची काय गरज आहे?,'' असे नायडू म्हणाले.
|