इंदिरा गांधींनी निर्वासितांना दिला होता आश्रय- अँटनी 

ए.के. अँटनी
ए.के. अँटनी

नवी दिल्ली : काँग्रेसचे वरिष्ठ नेता ए.के. अँटनी यांनी निर्वासित रोहिंग्यांच्या मुद्द्यावरून मोदी सरकारवर टीका केली आहे. रोहिंग्या नागरिकांना आश्रय देण्यास नकार दिल्याने अँटनी यांनी सरकारला धारेवर धरतानाच माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी बांगलादेशमधील निर्वासितांना दिलेल्या संरक्षणाची आठवण करून दिली. 

मदत व काळजीची गरज असताना 40 हजार रोहिंग्या नागरिकांना देशाच्या बाहेर हाकलण्यावरुन माजी संरक्षण मंत्री यांनी काल सरकारवर ताशेरे ओढले. बांगलादेशाहून एक कोटीपेक्षा जास्त निर्वासित 1970 मध्ये भारतात आले असता माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी अमेरिकेच्या सातव्या बेड्याला आश्रय देण्यापेक्षा बांगलादेशी निर्वासितांना आश्रय दिला होता, असे त्यांनी नमुद करित इंदिरा गांधींनी असे पाऊल उचलल्याने निर्माण झालेल्या युद्ध परिस्थितीची तमा न बाळगता त्या निर्वासितांसाठी नवीन राष्ट्र निर्माण केले होते, असेही नमुद केले. 

दिल्लीतील केरळी पत्रकार संघटनेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. अँटनी म्हणाले, "भारतात अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर कायम घाला घातला जातो. आपल्याला पाहिजे असणारे अन्न मिळवू न शकणे, आवडणारे चित्रपट बघू न शकणे वा पाहिजे ते लिहू न शकणे. या सगळ्या अडथळ्यांचे आव्हान आजही आपल्यापुढे आहे."
चर्चा आणि वादविवादांची संस्कृती असलेला भारत देश ही संस्कृती गमावत चालला असल्याचे ते यावेळी म्हणाले. आताच्या घडीला कोणीही निर्भयपणे स्वतःचे मत व्यक्त करु शकत नाही. तसेच भारतीय माध्यमे देखील ठामपणे विचार मांडू शकत नाहीत, असा खेद त्यांनी व्यक्त केला.

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या : 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com