सेल्फीसाठी आग्रह म्हणजे स्वातंत्र्यावर गदा : पर्यटनमंत्री

Alphons
Alphons

नवी दिल्ली : भारतात फिरण्यासाठी लाखो परदेशी पर्यटक ये-जा करत असतात. आपण त्यांच्यासोबत अनेकदा सेल्फीसाठी आग्रहही करतो असतो. ''परदेशी पर्यटकांना सेल्फीसाठी केलेला आग्रह हा त्यांच्या स्वातंत्र्यावर गदा आहे'', असे मत केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री के. जे. अल्फोन्स यांनी व्यक्त केले. 

नवी दिल्ली येथे आयोजित एका कार्यक्रमात अल्फोन्स बोलत होते. ते म्हणाले, ''आपण एखाद्या परदेशी पर्यटकाला सेल्फीसाठी आग्रह करतो, ही चांगली गोष्ट नाही. आपण त्यांना फिरण्यासाठी एकटे का सोडत नाही. अशाप्रकारे सेल्फीसाठी आग्रह म्हणजे परदेशी पर्यटकांच्या स्वातंत्र्यावर गदा आणण्यासारखे आहे''.

देशात काही महिन्यांपूर्वी सेल्फीच्या आग्रहात काही परदेशी पर्यटकांवर हल्ले झाल्याच्या घटना घडल्या आहेत. यामध्ये आग्रा येथील फतेहपूर, उत्तरप्रदेशातील मिर्झापूर येथे परदेशी पर्यटकांवर हल्ले झाले होते. याचा संदर्भ देत त्यांनी आपले मत व्यक्त केले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com