पापांमुळे कर्करोग होतो ; आसामच्या आरोग्यमंत्र्यांचे वादग्रस्त वक्तव्य

Himanta Biswa
Himanta Biswa

गुवाहटी : लोकांच्या पापांमुळे कॅन्सर उद्भवतो, असे वादग्रस्त वक्तव्य आसामचे आरोग्यमंत्री हिमंता बिसवा सर्मा यांनी केले. त्यांच्या या वादग्रस्त वक्तव्यामुळे नवा वादंग निर्माण होण्याची शक्यता आहे.

नवनियुक्त शालेय शिक्षकांच्या बैठकीत सर्मा यांनी हे विधान केले. सर्मा म्हणाले, आपल्या जबाबदाऱ्यांपासून पळणे हे पाप आहे. जर कोणी आपल्या कुटुंबीयांशी अन्याय करत असेल तर देव त्यांना कधीही माफ करणार नाही. देवाच्या न्यायालयात ते कधीही निर्दोष ठरू शकत नाहीत. ते पुढे म्हणाले, सध्या काही लोक कॅन्सरने ग्रस्त आहेत. यातील काही लोकांचा या गंभीर रोगाने मृत्यू होतो. हे जे होते ते फक्त त्यांच्याच पापांमुळे होते. 

त्यांच्या या वक्तव्यानंतर विरोधी पक्षांनी सर्मा यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे. भाजपच्या नेत्याने आरोग्य विभागातील आपले अपयश झाकण्यासाठीच त्यांनी असे वक्तव्य केले. सर्मा हे आरोग्य क्षेत्रात सुधारणा करण्यात अपयशी ठरले आहेत. त्यांनी काही वर्षांपूर्वी कॅन्सरशी लढण्यासाठी तंबाकूविरोधी कायदा तयार केला होता. मात्र, त्यांच्या या वादग्रस्त वक्तव्यामुळे त्यांनी आता सर्व कर्करोग पीडितांना दुखावले आहे, असे अखिल भारतीय संयुक्त डेमोक्रॅटिक फ्रंटचे प्रवक्ते अमिनूल इस्लाम यांनी सांगितले. 

त्यांच्या या वक्तव्यावरून माजी केंद्रीय गृहमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांनी त्यांच्यावर टीका केली. 

दरम्यान, मी कोणाशी तुलना केलेली नाही. 'कर्म' हे हिंदु धर्माशी आधारित आहे. त्यामुळे हे मी बदलू शकत नाही. मी त्याचे पालन करणार आहे. माझ्या वडिलांनीही खूप पाप केले असावे. त्यामुळे त्यांचा मृत्यू झाला, असेही ते म्हणाले.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News
www.esakal.com