उमेदवाराने दोन मतदारसंघातून निवडणूक लढवू नये: निवडणूक आयोग

EC
EC

नवी दिल्ली : निवडणुकांमध्ये एक उमेदवार दोन मतदारसंघातून निवडणूक लढवत असल्याचे अनेकदा निर्देशनास आले आहे. त्यामुळे जेव्हा एखादा उमेदवार दोन्ही मतदारसंघातून निवडणूक जिंकल्यास त्याला त्यापैकी एका जागेचा राजीनामा द्यावा लागतो. त्यामुळे रिक्त झालेल्या त्या जागेवर पुन्हा निवडणूक घ्यावी लागते. परिणामी निवडणुकीचा अतिरिक्त खर्च होतो. हा सर्व खर्च टाळण्यासाठी उमेदवाराने दोन मतदारसंघातून निवडणूक लढवू नये, असे निवडणूक आयोगाचे स्पष्ट केले आहे.

निवडणूक आयोगाने याबाबतचे मत सर्वोच्च न्यायालयासमोर मांडले. त्यावर अॅटर्नी जनरल के. के. वेणुगोपाल यांनी याबाबत सहकार्य केले पाहिजे, असे सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्या खंडपीठाने सांगितले. तसेच याप्रकरणाची सुनावणी तीन आठवड्यानंतर करणार असल्याचे सांगण्यात आले आहे. 

सर्वोच्च न्यायालयाने 13 ऑक्टोबरला निवडणूक आयोग आणि केंद्र सरकारला नोटीस पाठवून यावर उत्तर मागितले होते. याला आव्हान देत नवी याचिका दाखल करण्यात आली. या याचिकेद्वारे संसद आणि विधिमंडळाचे सर्व निवडणुकांसह उमेदवाराने मतदारासंघातून निवडणूक लढण्यावर बंदी आणण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली होती. त्यावर निवडणूक आयोगाने सर्वोच्च न्यायालयात हे मत व्यक्त केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com