‘लटकाना, अटकाना आणि पटकाना’ हे पूर्वीच्या सरकारचे धोरण : पंतप्रधान

National News PM Narendra Modi Criticizes Congress
National News PM Narendra Modi Criticizes Congress

नवी मुंबई : ‘लटकाना, अटकाना आणि पटकाना’ हे पूर्वीच्या सरकारचे धोरण होते. कोणताही प्रकल्प पूर्ण करण्याऐवजी ते लटकवण्यावरच यापूर्वीच्या सरकारचा भर होता. त्यांच्या कार्यकाळात सुमारे १० लाख कोटींचे प्रकल्प लटकवण्यात आले होते. मात्र, आमच्या सरकारने या सर्वावर काम केले आहे, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काँग्रेसवर टीकास्त्र सोडले. 

नवी मुंबई येथील आंतरराष्ट्रीय विमानतळाचे भूमिपूजन पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते आज (रविवार) करण्यात आले. यावेळी पंतप्रधान बोलत होते. ते म्हणाले, ''येत्या 2022 पर्यंत नवी मुंबईचे चित्र पालटण्यात येणार आहे. नवी मुंबईतील रस्ते आणि हवाई वाहतुकीत मोठे बदल झालेले दिसतील. याशिवाय छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय स्मारकासह सर्व महत्त्वाचे प्रकल्प पूर्ण करण्याचा सरकारचा प्रयत्न राहिल. देशात एव्हिएशन पॉलिसी नव्हती, आमच्या सरकारने याबाबतची पॉलिसी आणली. एव्हिएशन सेक्टरमधील सुधारणांमुळे देशातील पर्यटन क्षेत्रास चालना मिळणार आहे. 

''1997 मध्ये तत्कालीन अटलबिहारी सरकारने विमानतळांचे स्वप्न पाहिले होते. मात्र, त्यानंतरच्या सरकारने काहीही केले नाही. हा प्रकल्प फक्त कागदावर होता. पण आमच्या सरकाने यातील सर्व अडथळे दूर करून या प्रकल्पाचे भूमिपूजन केले आहे. यापूर्वीच्या सरकारने प्रकल्पांसाठी काहीही केले नाही. लटकाना, अटकाना, पटकाना असे यापूर्वीच्या सरकारचे धोरण होते'', असेही पंतप्रधान म्हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com