बांबूच्या लागवडीसाठी परवानगीची गरज नाही : पंतप्रधान

PM MODI
PM MODI

नवी दिल्ली : बांबू हे ईशान्यकडील लोकांचे उपजीविकेचे साधन आहे. यापूर्वी बांबूची वाहतूक आणि विक्री करण्यासाठी परवानगीची गरज होती. मात्र, आता सरकार बदलेले आहे. आता बांबूची निर्मिती, वाहतूक आणि त्याच्या विक्रीसाठी कोणत्याही परवानगीची आवश्यकता नाही. आता शेतकरी त्यांच्या स्वत:च्या शेतात याची लागवड करू शकतो, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.

मेघालयातील शिलाँग-तुरा रस्त्याच्या उद्घाटनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. मिझोरम आणि मेघालय या राज्यात पुढील वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ते येथील जनतेला संबोधित करणार असल्याचे सांगितले जात आहे.

ते म्हणाले, राज्यातील साक्षरता दर मोठा आहे. तसेच येथील निर्सगरम्य सुंदरता आणि मिझोरमचे नागरिक मोठ्या प्रमाणात इंग्रजी बोलत असल्याने हे राज्य आदर्श पर्यटनस्थळ म्हणून विकसित होईल. भारत सरकारने 15 नवे रेल्वेप्रकल्प आणले आहे. यातील 385 किमी लांबीच्या प्रकल्पासाठी 47 हजार कोटींचा खर्च येणार असल्याची माहितीही पंतप्रधानांनी दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com