रो-रो फेरीमुळे गुजरातमधील नागरिकांचे स्वप्न पूर्ण: मोदी

Narendra Modi
Narendra Modi

अहमदाबाद : गोघा आणि दहेज दरम्यान फेरी सेवा सुरु झाल्याने कोट्यवधी नागरिकांना याचा फायदा होणार असून, ते जवळ येतील. आज गुजरातमधील नागरिकांचे स्वप्न पूर्ण झाले आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले. मोदींच्या हस्ते रो-रो फेरीचे उद्धाटन करण्यात आले. 

गुजरातमधील आगामी निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे महिनाभरात तिसऱ्यांदा  गुजरात दौऱ्यावर आले आहेत. या वेळी त्यांनी भावनगरमधील गोघा ते भरूचमधील दहेज या गावांदरम्यान रो-रो फेरी सेवेचे उद्‌घाटन केले. दक्षिण आशियातील अशा प्रकारची ही पहिलीच सेवा आहे. आमच्या सरकारने फेरी योजनेसाठी अनेक बदल केले. या फेरीद्वारे पाचशे नागरिक आणि 100 गाड्या एकावेळी जाऊ शकणार आहे, असे मोदी यांनी यावेळी सांगितले.

या फेरी सेवेमुळे सौराष्ट्र आणि दक्षिण गुजरात जोडले जाणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे 2012 मध्ये गुजरातचे मुख्यमंत्री असताना त्यांनीच या प्रकल्पाची पायाभरणी केली होती. या सेवेचे उद्‌घाटन केल्यानंतर मोदी या फेरीबोटीने गोघा ते दहेज असा प्रवासही केला. प्रवासी आणि मालवाहतुकीसाठी चांगला पर्याय म्हणून या सेवेकडे पाहिले जात आहे. या प्रकल्पाच्या पायाभूत सुविधांसाठी 615 कोटी रुपयांचा खर्च झाला असून मुंबई आणि दक्षिणेतील राज्ये यांनाही या सेवेद्वारे जोडण्याचा सरकारचा विचार आहे. या फेरीसेवेमुळे रस्त्यावरून होणारा आठ तासांचा प्रवास फेरी बोटीने समुद्रमार्गे केवळ एका तासात होऊ शकतो. रस्तामार्गे असलेले 360 किमीचे अंतर समुद्रमार्गे केवळ 31 किमी असेल. 

रो-रो फेरीसेवेचे फायदे 
- इंधन बचत होत असल्याने पर्यावरणपूरक 
- प्रवास व वाहतूक खर्च कमी झाल्याने व्यापार वाढणार 
- रोजगार निर्मिती 
- पर्यटन क्षेत्राला पाठबळ

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com