भारताने 7 पाकिस्तानी सैनिक मारल्याचा दावा

Indian_Army_
Indian_Army_

इस्लामाबाद- भारतीय लष्कराने केलेल्या गोळीबारात ताबा रेषेवरील (LoC) सात पाकिस्तानी सैनिक मारले गेले असल्याचा दावा पाकिस्तान लष्कराने केला आहे. 
भिमबेर सेक्टरमध्ये रात्री भारताकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन करून पाकिस्तानचे सात सैनिक मारले गेले असे पाकिस्तानने एका निवेदनात म्हटले आहे. ताबारेषेनजीक भारतीय लष्कराने तोफांचा मोठा मारा केला तसेच रणगाडे विरोधी क्षेपणास्त्रही वापरल्याचे सूत्रांनी सांगितले. 
 
या गोळीबारानंतर पाककडून भारतीय चौक्यांवर गोळीबार करण्यात आला. मागील काही आठवड्यांमध्ये भारताकडून करण्यात आलेल्या कथित गोळीबारामध्ये मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांची संख्या 25 झाली असल्याचे त्यांनी म्हटले आहे. 
भारतीय सैन्याने पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून 29 सप्टेंबर रोजी सर्जिकल स्ट्राईक केल्यानंतर भारताने पाक पुरस्कृत घुसखोरीचे डाव 61 वेळा हाणून पाडले आहेत. 

पाकिस्तानच्या गोळीबारातही भारताचे काही जवान शहीद झाले. अनेक निष्पाप नागरीक मारले गेले. मागच्या काही दिवसात सीमा सुरक्षा दलाने केलेल्या कारवाईत पाकिस्तानचे मोठया प्रमाणावर नुकसान झाले पण पाकिस्तानने कधीही जाहीरपणे हे मान्य केले नाही. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com