नवी दिल्ली- राफेल करारावरून सर्वच जण आक्रमक झालेले असताना भाजपचे बंडखोर खासदार शत्रुघ्न सिन्हा यांनीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे. शत्रुघ्न सिन्हा यांनी ट्विटरच्या माध्यमातून मोदी यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे.
सिन्हा यांनी म्हटले आहे की, प्रधानमंत्रीजी आता तरी खरे बोला, देशाला सत्य जाणून घ्यायचे आहे. राफेल कराराचे पूर्ण प्रकरण काय आहे ते तुम्ही देशाला सांगण्याची गरज आहे अशा आशयाचे ट्विट सिन्हा यांनी केले आहे. तसेच, या मुद्यावर कुठलीतरी बाजू तुम्ही मांडावी अशी आमची इच्छा असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.
दरम्यान, केजरीवाल यांनीही मोदी यांनी राफेल करारावरुन लक्ष केले आहे. त्यांनी म्हटले आहे की, मोदींनी सांगायला हवे की, त्यांनी हा करार अनिल अंबानी यांच्या रिलायन्ससोबतच का केला, बाकी आणखी काही कंपन्या होत्या, त्यांच्यासोबतही हा करार मोदी करु शकले असते, परंतु त्यांनी या करारासाठी कमी अनुभव असलेल्या अनिल अंबानी यांच्याच कंपनीची निवड का केली. तसेच, अनिल अंबानी यांनी खूप वेळा सांगितलेले आहे की, त्यांचे मोदीसोबत वैयक्तिक संबध आहेत, आता यावर मोदींनी उत्तर द्यायला हवे की, हे संबध व्यावसायिक पण आहेत का ? त्याचबरोबर, राफेल करारामध्ये केलेल्या घोटाळ्यातील पैसा नेमका कोणाच्या खिशात गेला आहे याचे उत्तरदेखिल मोदींनी द्यायला हवे. हा पैसा मोदींच्या भाजपच्या की अन्य कोणाच्या खिशात गेला आहे याचे उत्तर पंतप्रधान नरेद्र मोदी यांनी द्यायला हवे. अशा प्रकारचे थेट प्रश्न करुन अरविंद केजरीवाल यांनीही नरेंद्र मोदी यांनी राफेल करारवरुन अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला आहे.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.