विजेच्या धक्‍क्‍याने सहा मच्छीमारांचा मृत्यू 

विजेच्या धक्‍क्‍याने सहा मच्छीमारांचा मृत्यू 

रूपोही (आसाम) : विजेचा धक्का बसून सहा मच्छीमारांचा मृत्यू झाला, तर अनेक जण जखमी झाले. आसाममधील नागाव जिल्ह्यातील रूपोही येथे ही दुर्घटना शुक्रवारी घडली. 

रूपोहीतील तळ्याजवळ 11 हजार व्हॉल्टची वीजवाहिनी लोंबकळलेल्या अवस्थेत होती. आज पहाटे येथील ग्रामस्थांनी विद्युत विभागाला याबाबतच कळविले होते. मात्र, वाहिनीत वीजप्रवाह नसल्याचे त्यांना सांगण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. त्यानंतर एक तासातच ही दुर्घटना घडली.

तळ्यात उतरलेल्या मच्छीमारांना या उच्च दाबाच्या वाहिनीचा स्पर्श होऊन विजेच्या धक्‍क्‍याने सहा मच्छीमारांचा मृत्यू झाला. जखमींना सरकारी रुग्णालयात दाखल केले आहे. या घटनेनंतर संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी वीज अधिकाऱ्याच्या घराची व मोटारीची तोडफोड केली. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News
www.esakal.com