झारखंडमध्ये एकाच कुटुंबातील 6 जणांनी केली आत्महत्या

Six people of a family in Jharkhand committed suicide
Six people of a family in Jharkhand committed suicide

हजारीबाग : झारखंडमधील हजारीबाग जिल्ह्यातील एकाच कुटुंबातील सहा जणांनी सामूहिक आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली. कर्जबाजारीपणाला कंटाळून या कुटुंबीयाने आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. याबाबतची सुसाईड नोट पोलिसांना मिळाली आहे.  

हजारीबाग जिल्ह्यात हे सर्वजण राहत होते. यातील पाच जणांनी गळफास घेऊन तर एकाने छतावरून उडी मारून आत्महत्या केली. महावीर माहेश्वरी (70), किरण माहेश्वरी (65), नरेश अग्रवाल (40), प्रिती अग्रवाल (37), यमन (11), यान्वी (6) या सहा जणांनी एकाचवेळी आत्महत्या केली. पोलिसांना घटनास्थळी तीन सुसाईड नोट मिळाल्या आहेत.

महावीर माहेश्वरी यांचे ड्रायफ्रूट्ची दुकाने असून, गेल्या काही दिवसांपासून मार्केटमधून 50 लाख ते एक कोटींपर्यंत पैसे येणे बाकी होते. मात्र, ते पैसे येत नसल्याने माहेश्वरी निराश होते. या नैराश्य आणि कर्जबारीपणामुळे या सर्वांनी आपली जीवनयात्रा संपवली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com