संकटातल्या साखर उद्योगाला हवा सरकारचा आधार 

sugar
sugar

मुंबई - साखरेच्या उत्पादनाने पुन्हा एकदा विक्रमी आकडे गाठले असल्याने संकटात सापडलेल्यांना हात दया अशी मागणी महासंघाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे. महाराष्ट्रातील बडया साखर उत्पादकांची स्थिती शोचनीय झाली असून आयात बंद करून निर्यातीला परवानगी दया असेही गाऱ्हाणे आहे.

साखर महासंघाचे अध्यक्ष आमदार दिलीप वळसे पाटील यांनी यासंदर्भात तातडीने बैठक घ्यावी ,साखर कारखानदारांना दिलासा दयावा अशी विनंती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केली आहे.  साखरेवरील निर्यात शुल्क शून्य करावे, आंतरराष्ट्रीय तसेच देशांतर्गत किंमतीत एकवाक्‍यता आणावी अशी मागणी महासंघाने केली आहे.

सन 2015 साली या प्रकारची मागणी करीत भारतातील साखर उत्पादनाला संरक्षण देण्यात आले होते.2003 2004 तसेच 2007 / 2008 या वर्षाप्रमाणे बफर स्टॉक करावा अशी मागणीही साखर महासंघाने केली आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com